फ्लॅटमध्ये आग लागल्याने या अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू

जयपूर : राजस्थानच्या कोटा येथे एका फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत अभिनेत्री रीता शर्माच्या दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये "वीर हनुमान" मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारा बाल कलाकार वीर शर्माचा समावेश आहे.तसेच या दुर्घटनेत वीरचा भाऊ शौर्य शर्माचाही मृत्यू झाला. वीर १० वर्षांचा आणि त्याचा भाऊ १५ वर्षांचा होता.


घरामध्ये आग लागली त्यावेळी मुलांचे पालक घरी नव्हते. वीरचे वडील जितेंद्र शर्मा संध्याकाळी भजनासाठी गेले होते, तर त्यांची आई रीता शर्मा काही कामानिमित्त मुंबईत गेली होती. रीता शर्मा या अभिनेत्री आहेत. अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांनी या दुर्घटनेत जीव गमावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतपुरा पोलीस स्टेशन परिसरातील दीपश्री इमारतीत ही घटना घडली. दोन्ही मुलं शनिवारी घरात झोपली होती. स्टेशन हाऊस ऑफिसर भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं की, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ४०३ मध्ये आग लागली. शेजाऱ्यांना फ्लॅटमधून धूर येताना दिसला, त्यानंतर दरवाजा तोडून मुलांना बाहेर काढण्यात आलं. दोन्ही मुलं बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

१० वर्षांचा वीर हा बाल कलाकार होता, तर त्याचा भाऊ शौर्य आयआयटीची तयारी करत होता. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Comments
Add Comment

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

मुंबई हायकोर्टाकडून शिल्पा शेट्टीला दिलासा, फोटोबाबत कोर्टात मोठा युक्तीवाद

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आज

Television Actress : टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या 'या' अभिनेत्री घेतात बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त मानधन; कमाई ऐकून व्हाल थक्क

अनेकदा आपल्या असं वाटतं की बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकतात त्यामुळे त्यांची कमाई फार जास्त असते.

अभिनेत्री दिपिका कक्कड भावूक, आरोग्याविषयी व्यक्त केली चिंता

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड हिला २०२५ मध्ये आपल्याला कॅन्सर असल्याचे समजले. नुकताच यासंबधित

Salman khan : बॉलीवूडच्या भाईजाननं अचानक बदललं आपल्या आगामी चित्रपटाचं नाव; सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत दिला 'हा' सामाजिक संदेश

बॉलीवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमानने आपल्या आगामी चित्रपटाचं नाव बदलण्याची घोषणा केली आहे. नुकताच एक सोशल

धुरंधर द रिंवेज नंतर 'धुरंधर ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार ?

रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. धुरंधर रिलीज झाल्यानंतर