विजयच्या प्रचारसभेत चेंगराचेंगरी, ३० पेक्षा जास्त मृत्यू

करूर : तामिळनाडूतील करूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. तामीळ सुपरस्टार आणि तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके)चा प्रमुख विजयने शनिवारी करूर येथे प्रचार केला. प्रचारसभेवेळी अफाट गर्दीत चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली आणि श्वास कोंडल्यामुळे दुर्घटना झाली, अनेकजण बेशुद्ध पडले. अनेक टीव्हीके कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिक एकामागून एक बेशुद्ध पडले. बेशुद्ध झालेल्यांना तातडीने करूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेकांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.





टीव्हीके प्रमुख विजयने शनिवारी प्रचारासाठी करूरला भेट दिली. त्याला बघण्यासाठी आणि त्याचे भाषण ऐकण्यासाठी हजारो नागरिक जमले होते. करूर द्रमुकचा गड आहे. या ठिकाणी विजयच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. याच अफाट गर्दीत चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली आणि श्वास कोंडल्यामुळे दुर्घटना झाली, अनेकजण बेशुद्ध पडले.


विजयच्या भाषणानंतर काही वेळातच गर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेक लोक बेशुद्ध पडले. रिपोर्टनुसार, उष्णता, पाण्याचा अभाव आणि गर्दीमुळे अनेक महिला, पुरुष आणि मुलं बेशुद्ध झाली. बेशुद्ध झालेल्या लोकांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. करूर सरकारी रुग्णालयात एकाच वेळी दहापेक्षा जास्त रुग्णवाहिका आल्या आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. डॉक्टरांनी अनेकांवर वेगाने आपत्कालीन उपचार केले. आतापर्यंत ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच करूर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सरकारी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांशी संवाद साधला तसेच रुग्णांच्या नातलगांना धीर दिला. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी त्री अनबिल महेश यांना करूरला जाण्याचे आदेश दिले.


पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक


विजयच्या प्रचारसभेत चेंगराचेंगरी झाली आणि ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्ट करुन शोक प्रकट केला.




Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

नवी दिल्ली: पोलीस स्मृतीदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या