IND vs SL: अर्शदीपची कमाल, सुपरओव्हरमध्ये भारताचा श्रीलंकेवर विजय

दुबई:आशिया कप २०२५मधील भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला होता. मात्र सुपर ओव्हरमध्ये भारताने बाजी मारली आणि सामना जिंकला. श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये २ विकेट गमावत केवळ दोन धावा केल्या होत्या. अर्शदीपच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज काहीच करू शकले नाहीत. त्यानंतर भारताने केवळ एकाच बॉलमध्ये ३ धावा करत सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेवर मात केली आणि सामना जिंकला.


भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक त्यानंतर तिलक शर्माच्या जबरदस्त धावांच्या जोरावर २०२ धावा केल्या होत्या.  हे आव्हान सुरूवातीला मोठे वाटत होते. मात्र श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका आला आणि त्याने जबरदस्त खेळीला सुरूवात केली.


त्याने या सामन्यात शानदार शतक ठोकत १०७ धावा केल्या. त्याच्या जोरावर श्रीलंकेचे फलंदाज शेवटपर्यंत लढले मात्र काही धावांनी त्यांना हा सामना गमवावा लागला. श्रीलंकेकडून सलामीवीर पथुम निसांकाने जबरदस्त १०७ धावांची खेळी केली. ५८ बॉलमध्ये ७ चौकार आणि ६ षटकांरांच्या जोरावर त्याने ही खेळी साकारली.



अशी होती भारताची खेळी 


या सामन्यात पहिल्यांदा धक्का बसला तो शुभमन गिलच्या रूपाने. शुभमन गिल अवघ्या ४ धावा करून बाद झाला. सलामीवीर अभिषेक शर्माचा जबरदस्त फॉर्म या सामन्यातही पाहायला मिळाला. त्याने ३१ बॉलमध्ये ६१ धावांची तुफानी खेळी केली. सूर्याही या सामन्यात चमकदार खेळी करू शकला नाही. त्याच्या बॅटमधून केवळ १२ धावा निघाल्या. संजू सॅमसनने ३९ धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या केवळ २ धावा करू शकला. अक्षर पटेल २१ तर तिलक वर्मा ४९ धावांवर नाबाद राहिले.


भारतीय संघ याआधी आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तेथे त्यांचा सामना रविवारी पाकिस्तानशी होणार आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाचे मात्र फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले.


भारताचे प्लेईंग ११


अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि वरूण चक्रवर्ती.


श्रीलंकेचे प्लेईंग ११


पथुम निसंका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, चरिथ असंलका(कर्णधार), जेनिथ लियानागे, कमिंदू मेंडिस, दासुन शनाका, वनिंदु हसारंगा, दुष्मंथा चमिरा, महीश तीक्ष्णा, नुवान तुषारा.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स