ऑक्टोबर २०२५ मध्ये महाराष्ट्रात या दिवशी बँकांना सुटी


मुंबई : नवरात्रौत्सवानंतर काही दिवसांनी दिवाळी हा सण आहे. यंदा दिवाळी ऑक्टोबर महिन्यात आहे. यामुळे ऑक्टोबर २०२५ मध्ये बँका किती दिवस सुरू राहणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.


बँकांना सुट्या या रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या चौकटीत राहून दिल्या जातात. या नियमांनुसार सर्व बँकांच्या महाराष्ट्रातील शाखांना ऑक्टोबर २०२५ मध्ये फक्त नऊ दिवस सुटी असेल. यापैकी चार दिवस हे रविवार आहेत तर दोन दिवस हे शनिवार आहेत. बँकांना रविवारी सुटी असते. या व्यतिरिक्त दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुटी असते. या व्यवस्थेनुसार सर्व बँकांच्या महाराष्ट्रातील शाखांना ऑक्टोबर २०२५ मध्ये रविवारच्या चार आणि शनिवारच्या दोन अशा एकूण सहा सुट्या मिळतील. या व्यतिरिक्त दसरा / गांधी जयंती, लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडवा या तीन दिवशीही बँकांना सुट्या मिळतील. यामुळे सर्व बँकांच्या महाराष्ट्रातील शाखांना ऑक्टोबर २०२५ मध्ये एकूण नऊ दिवस सुट्या मिळतील.


यूपीआय सेवा, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, एटीएम, डिपॉझिट मशीन, क्रेडिट आणि डेबिट कार्ड यामुळे बहुसंख्य नागरिकांना थेट बँकेत न जाता विना अडथळा आर्थिक व्यवहार करता येतात. यामुळे सर्व बँकांच्या महाराष्ट्रातील शाखांना ऑक्टोबर २०२५ मध्ये नऊ दिवस सुट्या असल्या तरी नागरिकांचे बहुसंख्य आर्थिक व्यवहार विना अडथळा सुरळीत सुरू राहतील.



महाराष्ट्रात या दिवशी बँकांना सुटी



  1. गुरुवार २ ऑक्टोबर २०२५ - दसरा, गांधी जयंती

  2. रविवार ५ ऑक्टोबर २०२५ - पहिला रविवार

  3. शनिवार ११ ऑक्टोबर २०२५ - दुसरा शनिवार

  4. रविवार १२ ऑक्टोबर २०२५ - दुसरा रविवार

  5. रविवार १९ ऑक्टोबर २०२५ - तिसरा रविवार

  6. मंगळवार २१ ऑक्टोबर २०२५ - लक्ष्मीपूजन

  7. बुधवार २२ ऑक्टोबर २०२५ - दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा

  8. शनिवार २५ ऑक्टोबर २०२५ - चौथा शनिवार

  9. रविवार २६ ऑक्टोबर २०२५ - चौथा रविवार


Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

नवी दिल्ली लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात तपासात नवे धक्कादायक खुलासे!

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कार स्फोट प्रकरणात तपासाला मोठा वळण आले आहे.

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

दिल्लीत जैश-ए-मोहम्मदकडून हवालामार्गे आले २० लाख ? तपासकर्त्यांसमोर नवीन कोडे

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात गुप्तचर यंत्रणांना डॉ. उमर, डॉ.