एमपीएससीची २८ सप्टेंबरची परीक्षा या दिवशी होणार


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एमपीएससीने २०२५ पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे. नव्या अभ्यासक्रमाची राज्यसेवा पूर्व परीक्षा पहिल्यांदाच २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार होती. पण राज्यातील काही जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी होणार असलेली एमपीएससीची परीक्षा आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे प्रामुख्याने पुराचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात २८ सप्टेंबर रोजी होणार असलेल्या इतर परीक्षांचेही नवे वेळापत्रक जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची प्रक्रिया सुरू आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी एक लाख ७५ हजार ५१६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्याच्या काही भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा पुराचा धोका असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी केंद्रावर येण्याकरिता मोठे दिव्य करावे लागेल. यामुळेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एमपीएससीने २८ सप्टेंबर रोजी होणार असलेली एमपीएससीची परीक्षा आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध