रील बनवणे पडले महागात, पाच जणांचा बुडून मृत्यू

पाटणा : बिहारमधील गयाजी येथे गुरुवारी (२५ सप्टेंबर) एक मोठी दुर्दैवी घटना घडली. खिजरसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत केनी पुलाजवळ, रील (व्हिडीओ) बनवण्याच्या नादात ९ मुलं नदीत बुडाली. यामध्ये ५ मुलांचा मत्यू झाला आहे.

माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (२५ सप्टेंबर) केनी घाटाजवळ घडली आहे. हि सर्व मुलं शाळेतून परत येत होती, आणि त्याच वेळी व्हिडीओ (रील) बनवण्यासाठी नदीच्या काठावर गेली, आणि बुडायला लागले.मुलांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले. मोठ्या प्रयत्नांनंतर सर्वांना बाहेर काढण्यात आलं.यानंतर सर्व मुलांना तातडीने बेलागंज प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर यातील दोन मुलांना पुढील उपचारासाठी अनुग्रह नारायण मगध मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आलं, तर उर्वरित सात मुलांना बेलागंज आरोग्य केंद्रातच दाखल करण्यात आलं.त्यामधून पाच मुलांचा मृत्यू झाला आहे आणि दोन मुलांवर उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, या मुलांपैकी काही ११वीत शिकत होते तर काही १२वीत.

नीमचक बथानी उपविभागीय अधिकारी (एसडीएम) केशव आनंद यांनी सांगितले की, ब्लॉक अधिकारी आणि पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत ६ मुलांची ओळख पटली असून तौसीफ, जासिफ, साहिल, जैम,सुफियान आणि साजिद अशी या मुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, उर्वरित माहिती जिवंत वाचलेल्या मुलांच्या जबाबानंतर स्पष्ट होईल. या मुलांमध्ये कोणी सख्खे भाऊ होते का, किंवा काहीजण एका कुटुंबातील होते का, याचा तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन