रील बनवणे पडले महागात, पाच जणांचा बुडून मृत्यू

पाटणा : बिहारमधील गयाजी येथे गुरुवारी (२५ सप्टेंबर) एक मोठी दुर्दैवी घटना घडली. खिजरसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत केनी पुलाजवळ, रील (व्हिडीओ) बनवण्याच्या नादात ९ मुलं नदीत बुडाली. यामध्ये ५ मुलांचा मत्यू झाला आहे.

माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (२५ सप्टेंबर) केनी घाटाजवळ घडली आहे. हि सर्व मुलं शाळेतून परत येत होती, आणि त्याच वेळी व्हिडीओ (रील) बनवण्यासाठी नदीच्या काठावर गेली, आणि बुडायला लागले.मुलांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले. मोठ्या प्रयत्नांनंतर सर्वांना बाहेर काढण्यात आलं.यानंतर सर्व मुलांना तातडीने बेलागंज प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर यातील दोन मुलांना पुढील उपचारासाठी अनुग्रह नारायण मगध मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आलं, तर उर्वरित सात मुलांना बेलागंज आरोग्य केंद्रातच दाखल करण्यात आलं.त्यामधून पाच मुलांचा मृत्यू झाला आहे आणि दोन मुलांवर उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, या मुलांपैकी काही ११वीत शिकत होते तर काही १२वीत.

नीमचक बथानी उपविभागीय अधिकारी (एसडीएम) केशव आनंद यांनी सांगितले की, ब्लॉक अधिकारी आणि पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत ६ मुलांची ओळख पटली असून तौसीफ, जासिफ, साहिल, जैम,सुफियान आणि साजिद अशी या मुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, उर्वरित माहिती जिवंत वाचलेल्या मुलांच्या जबाबानंतर स्पष्ट होईल. या मुलांमध्ये कोणी सख्खे भाऊ होते का, किंवा काहीजण एका कुटुंबातील होते का, याचा तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने