रील बनवणे पडले महागात, पाच जणांचा बुडून मृत्यू

पाटणा : बिहारमधील गयाजी येथे गुरुवारी (२५ सप्टेंबर) एक मोठी दुर्दैवी घटना घडली. खिजरसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत केनी पुलाजवळ, रील (व्हिडीओ) बनवण्याच्या नादात ९ मुलं नदीत बुडाली. यामध्ये ५ मुलांचा मत्यू झाला आहे.

माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (२५ सप्टेंबर) केनी घाटाजवळ घडली आहे. हि सर्व मुलं शाळेतून परत येत होती, आणि त्याच वेळी व्हिडीओ (रील) बनवण्यासाठी नदीच्या काठावर गेली, आणि बुडायला लागले.मुलांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले. मोठ्या प्रयत्नांनंतर सर्वांना बाहेर काढण्यात आलं.यानंतर सर्व मुलांना तातडीने बेलागंज प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर यातील दोन मुलांना पुढील उपचारासाठी अनुग्रह नारायण मगध मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आलं, तर उर्वरित सात मुलांना बेलागंज आरोग्य केंद्रातच दाखल करण्यात आलं.त्यामधून पाच मुलांचा मृत्यू झाला आहे आणि दोन मुलांवर उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, या मुलांपैकी काही ११वीत शिकत होते तर काही १२वीत.

नीमचक बथानी उपविभागीय अधिकारी (एसडीएम) केशव आनंद यांनी सांगितले की, ब्लॉक अधिकारी आणि पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत ६ मुलांची ओळख पटली असून तौसीफ, जासिफ, साहिल, जैम,सुफियान आणि साजिद अशी या मुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, उर्वरित माहिती जिवंत वाचलेल्या मुलांच्या जबाबानंतर स्पष्ट होईल. या मुलांमध्ये कोणी सख्खे भाऊ होते का, किंवा काहीजण एका कुटुंबातील होते का, याचा तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

सौदी अरेबियातील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू; भारतीय दूतावासाकडून शोकसंवेदना

सौदी अरेबियातील रियाध येथे १८ मार्च रोजी एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबाबत भारतीय दूतावासाने

भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने

India-China Relations : भारत चीन संबंध अधिक दृढ होणार; बीजिंग आणि दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू

भारत आणि चीन दरम्यानची हवाई वाहतूक आता पूर्ववत होत आहे. नवी दिल्ली आणि चीनची राजधानी बीजिंग दरम्यानची विमानसेवा

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशच्या उंच भागांत शुक्रवारी (२० मार्च) जोरदार हिमवृष्टी तर खालच्या भागांत मुसळधार पाऊस झाला. लाहौल

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील