'अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा' - मंत्री नितेश राणे

'अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पहाणी करावी, मत्स्य व्यवसाय संस्थांनी संपर्क करावा'


मुंबई : राज्यात यंदाच्या वर्षी अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या १० दिवसात सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पहाणी करून आणि मत्स्य व्यवसाय संस्थांशी संपर्क करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.


मंत्रालयात अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस मत्स्य व्यवसाय सचिव एन. रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील सर्व मत्स्य व्यवसाय उपायुक्त दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, स्वतः अधिकाऱ्यांनी मत्स्य शेतकऱ्यांना संपर्क केल्यास त्यांचे मनोधैर्य वाढते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची भेट घ्यावी. पंचनामे करताना वस्तुनिष्ठ महिती घ्यावी. ज्या जिल्ह्यात पंचनामे करण्यासाठी अधिकारी कमी आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी न झालेल्या इतर जिल्ह्यातील अधिकारी नियुक्त करून पंचनामे लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. पंचनाम्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून त्याची प्रत मंत्रालय स्तरावर सादर करावी. मत्स्य बिजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची सविस्तर माहिती सादर करावी. माहिती सादर करत असताना बाब निहाय अकडेवारी द्यावी, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.


मंत्री राणे म्हणाले की, तलावातील गाळ काढला गेला नसल्याने मत्स्य शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे या वर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांमध्ये तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करावे. या कामासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी. अधिकाऱ्यांनी रोज किमान ८ ते १० तलावांना भेट द्यावी. दिलेल्या भेटीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयामार्फत सादर करावा असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई पोलिसांची कमाल! जम्मूचा फरार आरोपी वांद्र्यातील लकी हॉटेलमध्ये सापडला

मुंबई: मुंबई गुन्हे शाखेने जम्मूमध्ये खून, दरोडा आणि खंडणीसाठी हवा असलेला एक फरार आरोपी रॉयल मनजीत सिंगला

कुर्ल्यातील झोपड्यांना लागली भीषण आग, कारण काय?

मुंबई: कुर्ला पश्चिम येथील सेवक नगर परिसरात बुधवारी दुपारी आग लागून काही झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने, या

'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करण्याचे नियोजन करा' - मंत्री नितेश राणे

'मच्छिमारांसाठीचे कल्याणकारी महामंडळ स्थापन्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा' मुंबई : प्रधानमंत्री मत्स्य संपदा

कांदिवलीत गॅस सिलिंडरचा स्फोट; ७ जण गंभीर जखमी !

मुंबई : मुंबईच्या कांदिवली (पूर्व) परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका दुकानात आग लागल्याची घटना घडली. या आगीत

जीएसटी कपातीनंतर 'मिल्की मिस्ट'ने ३०० उत्पादनांच्या किमती कमी केल्या

मुंबई: मदर डेअरी आणि अमूलच्या पावलावर पाऊल ठेवत, 'मिल्की मिस्ट डेअरी फूड्स लि.'ने अलीकडील 'जीएसटी' दर कपातीचा फायदा

इंडिगो पाठोपाठ एअर इंडियाची विमानेही नवी मुंबई विमानतळावरुन भरारी घेणार

उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार असून,