इंडिगो पाठोपाठ एअर इंडियाची विमानेही नवी मुंबई विमानतळावरुन भरारी घेणार

उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात


मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार असून, त्यापूर्वीच विमान कंपन्यांनी येथे सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. इंडिगो एअरलाईन्सपाठोपाठ आता एअर इंडियानेही या विमानतळावरून मोठी भरारी घेण्याची घोषणा केली आहे.


मंगळवारी एअर इंडियाने जाहीर केले की, कंपनी २०२६ च्या मध्यापर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज ५५ विमानांचे उड्डाण करेल. २०२६ च्या हिवाळ्यापर्यंत ही संख्या वाढवून दररोज ६० विमाने उड्डाण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. यात आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या ३० सप्टेंबर रोजी होण्याची दाट शक्यता आहे. सिडको युद्धपातळीवर विमानतळाची कामे पूर्ण करत आहे. उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच एअर इंडियाने ही माहिती दिली आहे.


या विमानतळावरून उड्डाण सुरू करणारी पहिली विमान कंपनी इंडिगो एअरलाईन्स ठरली आहे. इंडिगोने सुरुवातीपासूनच दररोज १५ हून अधिक शहरांसाठी १८ उड्डाणे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विमानतळ सुरू झाल्यावर दररोज एकूण ७९ उड्डाणे होणार आहेत. यापैकी १४ उड्डाणे आंतरराष्ट्रीय असतील. यापूर्वी, २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले चाचणी उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केले होते.



जागतिक केंद्र बनण्याचे उद्दिष्ट


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्हीसाठी एक प्रमुख जागतिक वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचे सीईओ अरुण बन्सल यांनी या विमानतळाला यशस्वी आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे बनवण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. एअर इंडियाच्या या विस्तारामुळे जागतिक विमान वाहतुकीच्या क्षेत्रात भारताचे स्थान अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. हे विमानतळ आपल्या धोरणात्मक स्थानामुळे भारताला उर्वरित जगाशी जोडण्याचे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल.

Comments
Add Comment

Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७

BMC News : मुंबईतील नालेसफाईचे काम सुमारे ३९ टक्के

यंदा मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्याचे प्रमाण होणार कमी दादर, माटुंगा रोड येथीलही तुंबई होणार कमी मुंबई

Ashwini Bhide : महापालिका आयुक्त आश्विनी भिडे सकाळीच पोहोचल्या रस्त्यावर स्वच्छतेच्या कामाचा घेतला आढावा

मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबई शहर विभागातील वडाळा आणि पूर्व उपनगरे विभागातील