Pakistan vs Sri Lanka :  पाकिस्तानच्या गोलंदाजांचा क़हर, श्रीलंकेला १३३ धावांवर रोखले

अबुधाबी:  आशिया कपमधील सुपर ४मध्ये आज पाकिस्तानचा मुकाबला श्रीलंकेशी होत आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी बोलावण्यात आले. पाकिस्तानसाठी हा सामना करो वा मरोचा आहे. हीच परिस्थिती श्रीलंकेचीही आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरले आहेत. श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना मेंडिसच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत १३३ धावा केल्या आहेत.  पाकिस्तानला विजयासाठी १३४ धावांचे आव्हान आहे.


पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात अतिशय खराब झाली. सामन्याच्या दुसऱ्याच बॉलवर शाहीन आफ्रिदीने श्रीलंकेला पहिला झटका दिला. कुसल मेंडिस खाते न खोलता बाद झाला. यानंतर तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर शाहीनने निसंकाला बाद केले. सहाव्या षटकांत कुसल परेराला बाद केले. परेराने १५ धावा केल्या.


कर्णधार चरिस असलांकाने 20 धावांची खेळी केली. एका बाजूने कमिंदू मेंडिस किल्ला लढवत होता. तर दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होत होते. त्याच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेला शंभरचा आकडा पार करता आला. मेंडिसने ५० धावा केल्या. त्यानंतर जास्त काळत श्रीलंकेचे फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. त्यांना केवळ १३३ धावांपर्यंत मजल मारता आली.

Comments
Add Comment

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू

आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sri Lanka Cricket Team : विश्वचषकासाठी श्रीलंकेची जोरदार तयारी; प्रशिक्षकपदी केली 'या' महान खेळाडूची नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय