Pakistan vs Sri Lanka :  पाकिस्तानच्या गोलंदाजांचा क़हर, श्रीलंकेला १३३ धावांवर रोखले

अबुधाबी:  आशिया कपमधील सुपर ४मध्ये आज पाकिस्तानचा मुकाबला श्रीलंकेशी होत आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी बोलावण्यात आले. पाकिस्तानसाठी हा सामना करो वा मरोचा आहे. हीच परिस्थिती श्रीलंकेचीही आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरले आहेत. श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना मेंडिसच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत १३३ धावा केल्या आहेत.  पाकिस्तानला विजयासाठी १३४ धावांचे आव्हान आहे.


पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात अतिशय खराब झाली. सामन्याच्या दुसऱ्याच बॉलवर शाहीन आफ्रिदीने श्रीलंकेला पहिला झटका दिला. कुसल मेंडिस खाते न खोलता बाद झाला. यानंतर तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर शाहीनने निसंकाला बाद केले. सहाव्या षटकांत कुसल परेराला बाद केले. परेराने १५ धावा केल्या.


कर्णधार चरिस असलांकाने 20 धावांची खेळी केली. एका बाजूने कमिंदू मेंडिस किल्ला लढवत होता. तर दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होत होते. त्याच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेला शंभरचा आकडा पार करता आला. मेंडिसने ५० धावा केल्या. त्यानंतर जास्त काळत श्रीलंकेचे फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. त्यांना केवळ १३३ धावांपर्यंत मजल मारता आली.

Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या