Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी Cabinet Meeting पूर्वीच खुशखबर; २,२१५ कोटींच्या मदतीत कुणाला फायदा?

मुंबई : महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे शेती आणि जनजीवन गंभीर संकटात सापडले आहे. राज्यभरात ७० लाख एकरावर पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक गावांमध्ये पूरस्थितीही निर्माण झाली आहे. यामुळे शाळा, घरं आणि पिकं सर्वत्र धोक्यात आली आहेत. सध्या कॅबिनेटची बैठक सुरू असताना, कृषी आणि पुनर्वसन विभागाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. खरीप २०२५ सत्रासाठी पिकांच्या नुकसानीसाठी २,२१५ कोटी रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीचा थेट लाभ ३१.६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल, अशी माहिती शासनाने दिली आहे. या निर्णयामुळे पावसामुळे प्रभावित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचा नुकसानभरपाईत मोठा दिलासा मिळेल, असा शासनाचा दावा आहे.



२,२१५ कोटींच्या मदतीला सरकारची मंजुरी


विदर्भ आणि मराठवाडा हाहाकारात आहेत, तर पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांवर पावसाचा तडाखा बसला आहे. शासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत असून, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल ३२ लाख शेतकऱ्यांचे पिक मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यासाठी शासनाने २,२१५ कोटी रुपयांच्या पिक नुकसान भरपाईसाठी मंजूरी दिली आहे. या निधीचा फायदा राज्यभरातील प्रभावित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी २,२१५ कोटी रुपयांच्या मदतीला शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी आजच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करता येईल, ज्यामुळे आर्थिक मदतीचा त्वरित लाभ त्यांना मिळेल. यामध्ये विदर्भातील काही जिल्हे तसेच मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड आणि बीडसारख्या भागांचा समावेश आहे, जिथे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा आढावा युद्धपातळीवर सुरू असून, विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानग्रस्त गावांची आणि जिल्ह्यांची विभागवार आकडेवारी तयार करण्यात आली आहे. अद्याप काही भागात पाणी साचलेले असल्याने तिथे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. पाणी ओसरल्यावर लगेचच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचनामे करण्याचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार केली आहे.



शेतकऱ्यांसाठी १,३३९ कोटींची मदत जाहीर


अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १,३३९ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या काळात झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांवर आधारित आहे. सरकारच्या या निर्णयानुसार, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल. बीड, धाराशिवसह काही जिल्ह्यांमध्ये अद्याप रेस्क्यू ऑपरेशन्स सुरू आहेत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या परिस्थितीवर लक्ष ठेवत रेस्क्यू ऑपरेशन आणि मदतीच्या कामाची माहिती दिली आहे.

Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील

Pune News : पुणे स्थानकातून प्रवाशांची अजब हातसफाई : ५ वर्षांत ३ कोटींचे बेडशीट अन् टॉवेल लंपास; रेल्वेने ठेकेदाराकडून वसूल केली भरपाई!

पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यातून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक