गायक झुबीन गर्ग अनंतात विलीन


कामरूप : आसाममधील कामरूप जिल्ह्यातील कामरकुची एनसी गावात लोकप्रिय गायक झुबीन गर्गवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी लाखोंच्या संख्येने चाहत्यांनी आणि मान्यवरांनी गर्दी केली होती. सिंगापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलेल्या झुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना झालेल्या दुखापतीमुळे अपघाती मृत्यू झाला.


पाण्याखालीच झुबीनची तब्येत बिघडली. झुबीन बुडत असल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने पाण्याबाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. झुबीनचे पार्थिव सिंगापूर येथून विशेष विमानाने आसाममध्ये आणण्यात आले. झुबीनची अंत्ययात्रा अर्जुन भोगेश्वर बरुआ क्रीडा संकुलापासून सुरू झाली. क्रीडा संकुलात चाहत्यांनी अंत्यदर्शन घेतले. यानंतर अंत्ययात्रा सुरू झाली. पार्थिव रस्ते मार्गे स्मशानात नेण्यात आले. तिथे अंत्यसंस्कार झाले.


आसाम सरकार झुबीनच्या सन्मानार्थ दोन स्मारकांची निर्मिती करणार आहे. या संदर्भातील घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केली. झुबीन १९ सप्टेंबर रोजी लाईफ जॅकेट न घालता स्कुबा डायव्हिंगसाठी पाण्यात उतरला होता. हा निर्णय झुबीनसाठी प्राणघातक ठरला.


धाकट्या भावंडांनी केले अंत्यसंस्कार


झुबीनची धाकटी बहीण पमी बोरठाकूर आणि मानलेला धाकट भाऊ गायक राहुल गौतम या दोघांनी त्याच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पूर्ण केले. चितेला अग्नी देण्यात आला त्यावेळी 'जय झुबीन दा', 'झुबीन दा झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या.


Comments
Add Comment

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर