आजपासून आदिमायेचा जागर, बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी


मुंबई : आज घटस्थापना. घट बसले. पूजा झाली. सोमवारी संध्याकाळी गरबा आणि दांडिया नाईटनं सार्वजनिक मंडळांमध्ये नवरात्रौत्सवाची औपचारिक सुरुवात होणार आहे. आदल्या दिवशी रविवारची सुटी आल्यामुळे नवरात्री निमित्त खरेदी करणाऱ्यांची ठिकठिकाणच्या बाजारांमध्ये गर्दी झाली होती. सार्वजनिक मंडळांनी रविवारी तयारीवर अखेरचा हात फिरवला. अनेक ठिकाणी पावसानं विश्रांती घेतल्यामुळे रविवारी संध्याकाळीच अनेक सार्वजनिक मंडळांनी देवीची मूर्ती वाजतगाजत मंडपांमध्ये आणली आहे.


नवरात्रीच्या काळामध्ये अनेक घरांमध्ये घटही बसतात. याच्या तयारीसाठी स्थानिक बाजारांमध्ये रविवारी घटांसह माती, नवरात्रीमध्ये पेरली जाणारी धान्ये विक्रीसाठी उपलब्ध होती. या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी उसळली होती. फुल बाजारात झेंडू १५० रुपयांपासून पुढे आणि शेवंती १०० रुपयांपासून पुढे दर्जानुसार उपलब्ध आहे.


मुंबादेवी मंदिरात पहाटे साडेपाचपासूनच दर्शनासाठी रांगा दिसत होत्या. मंदिरात सकाळी घटस्थापना झाली. मुंबईतील विविध मंडळांमध्ये आजपासून दुर्गेची आराधना सुरू झाली आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्नाने आता पुढचे १० दिवस गरबा, दांडिया, भोंडल्याच्या गाण्यांवर मुंबईकर फेर धरताना दिसतील.


सोमवारसाठी मुंबई, ठाणे, पालघर तसेच रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवार ते गुरुवार दरम्यान मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. गुरुवारी रायगड आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी