ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोची चाचणी


ठाणे : ठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या 'गायमुख - कासारवडवली - वडाळा' या 'मेट्रो - ४' आणि 'मेट्रो - ४ अ'च्या गाड्यांची चाचणी घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच आज सोमवार २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.





गायमुख ते घोडबंदर रोड येथील विजय गार्डनपर्यंत मेट्रोची चाचणी झाली. यावेळी मेट्रोतून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांनी प्रवास केला. चाचणीच्या निमित्ताने घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी ठाणेकरांना 'शुभवार्ता' अनुभवता आली. मूळ नियोजनानुसार आतापर्यंत 'मेट्रो - ४' आणि 'मेट्रो - ४ अ' या संपूर्ण मार्गावर सुरळीत धावणे अपेक्षित होते. पण उद्धव सरकारच्या काळात मेट्रोशी संबंधित अनेक कामं थांबली होती. यामुळे ठाण्यातून धावणार असलेल्या मेट्रोची फक्त गायमुख ते विजय गार्डन या मर्यादीत मार्गावर चाचणी घेण्यात आली. आता मेट्रोची रखडलेली कामं सुरू झाली आहेत.


कामं पुन्हा रुळावर आली आहेत. यामुळे लवकरच ठाण्यातून मेट्रो धावणार, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रकल्पाच्या दिरंगाईसाठी उद्धव सरकारचा कारभार कारणीभूत ठरल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.


प्रताप सरनाईक यांनी आमदार असताना ठाण्यातून मेट्रो धावावी यासाठी पाठपुरावा केला. आता सरनाईक राज्याचे परिवहन मंत्री असताना ठाण्यातून मेट्रो लवकरच सुरू होईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. पत्रकारांशी संवाद साधताना मेट्रोच्या कामासाठी सरनाईक यांनी केलेल्या प्रयत्नांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीरपणे उल्लेख केला.


Comments
Add Comment

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

युद्धावर बोलण्याऐवजी राज्यसभा निवडणुकीत उबाठाची मते फुटणार नाहीत याकडे लक्ष द्या, बन यांचा राऊतांना टोला

मुंबई : महाविकास आघाडीतील भांडणे ज्यांना सोडवता येत नाहीत, राज्यसभेच्या जागेवरून तीन पक्षातील कुरघोड्या

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना आणि मदतीसाठीचे हेल्पलाईन आणि व्हॉटसॲप क्रमांक

मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल

मुंबई : युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री

'सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तात्काळ निकाली काढा'

मुंबई : गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई