ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोची चाचणी


ठाणे : ठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या 'गायमुख - कासारवडवली - वडाळा' या 'मेट्रो - ४' आणि 'मेट्रो - ४ अ'च्या गाड्यांची चाचणी घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच आज सोमवार २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.





गायमुख ते घोडबंदर रोड येथील विजय गार्डनपर्यंत मेट्रोची चाचणी झाली. यावेळी मेट्रोतून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांनी प्रवास केला. चाचणीच्या निमित्ताने घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी ठाणेकरांना 'शुभवार्ता' अनुभवता आली. मूळ नियोजनानुसार आतापर्यंत 'मेट्रो - ४' आणि 'मेट्रो - ४ अ' या संपूर्ण मार्गावर सुरळीत धावणे अपेक्षित होते. पण उद्धव सरकारच्या काळात मेट्रोशी संबंधित अनेक कामं थांबली होती. यामुळे ठाण्यातून धावणार असलेल्या मेट्रोची फक्त गायमुख ते विजय गार्डन या मर्यादीत मार्गावर चाचणी घेण्यात आली. आता मेट्रोची रखडलेली कामं सुरू झाली आहेत.


कामं पुन्हा रुळावर आली आहेत. यामुळे लवकरच ठाण्यातून मेट्रो धावणार, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रकल्पाच्या दिरंगाईसाठी उद्धव सरकारचा कारभार कारणीभूत ठरल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.


प्रताप सरनाईक यांनी आमदार असताना ठाण्यातून मेट्रो धावावी यासाठी पाठपुरावा केला. आता सरनाईक राज्याचे परिवहन मंत्री असताना ठाण्यातून मेट्रो लवकरच सुरू होईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. पत्रकारांशी संवाद साधताना मेट्रोच्या कामासाठी सरनाईक यांनी केलेल्या प्रयत्नांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीरपणे उल्लेख केला.


Comments
Add Comment

कर्नाटकात खळबळ, माजी आमदाराच्या मुलाची हत्या; जळालेल्या कारमध्ये...

धारवाड: कर्नाटकच्या धारवाडजवळील एका निर्जनस्थळी जळालेल्या कारमध्ये कोळसा झालेला मृतदेह सापडल्याने हत्येचा

महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांचा झाला टाय टाय फिश; पाणी पट्टी वाढवल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न, आयुक्तांनी काढली हवा

मुंबई: मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात बसलेल्या उबाठाच्या नगरसेवकांचा आपण सक्षम विरोधी पक्ष असल्याचे सिद्द

Ashok Kharat: न्यायालयात बोलताना जादुटोणाबाबत काय म्हणाला अशोक खरात?

मुंबई: महिलांवर लैंगिक अत्याचार आणि तंत्र-मंत्राचा वापर करीत अमानुष अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याला

Indian Railway Rules: रेल्वे तिकीट आठ दिवसांपूर्वी रद्द केल्यावर रिफंड...; रेल्वेच्या नियमांत महत्त्वाचा बदल

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या

समुद्रात मासे कमी आणि कचराच जास्त; महापालिका सभागृहात कोळी समाजाच्या नगरसेवकांना मांडावी लागली व्यथा

मुंबई: मुंबईत सध्या मोठ्याप्रमाणात समुद्रातील कचरा आणि मलमिश्रित पाणी जात असल्यामुळे नगरसेवकांनी तीव्र चिंता

Sonia Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक मंगळवारी रात्री