मुंब्रामध्ये कंटेनरची दुचाकीला धडक, तीन मुलांचा जागीच मृत्यू

ठाणे : मुंब्रामध्ये भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ३ मुलांना कंटेनरने चिरडल्याने तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. मुंब्रामधील गावदेवी बायपासजवळ ही अपघाताची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रामध्ये आज दुपारच्या सुमारास भयंकर अपघात झाला. गावदेवी बायपास परिसरात ३ मुलांना कंटेनरने चिरडलं. दुचाकीवरून ही तिन्ही मुलं चालले होते. त्यावेळी कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कंटेनरच्या चाकाखाली येऊन या तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. तिघांच्या मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

या अपघाताची माहिती मिळताच फायरब्रिगेड, रुग्णवाहिका आणि मुंब्रा पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तिन्ही मुलं कामासाठी दुचाकीवरून ठाण्यातून शिळफाटा येथे जात होते त्याचवेळी ही भयंकर घटना घडली. मुंब्रा पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत मोठी गर्दी केली होती . त्यामुळे काही काळ घटनास्थळावर तणावाचे वातावरण होते. मुंब्रा बायपासवर नेहमी अशा प्रकारचे अपघात होत असतात. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी