अरुण गवळी तुरुंगातून बाहेर, आता लेक योगिता गवळी राजकारणात सक्रिय!

मुंबई: अनेक वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेले माजी आमदार अरुण गवळी यांनी आता राजकारणात सक्रिय होणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यांच्या जागी त्यांची दुसरी मुलगी योगिता गवळी राजकारणात प्रवेश करणार आहे. यापूर्वीच त्यांची मोठी मुलगी गीता गवळी राजकारणात सक्रिय आहे. अखिल भारतीय सेना पक्षाकडून या दोन्ही मुली आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणार आहेत.


?si=LhJ_OwXY9iKmH5sm

गवळी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी


१९८० च्या दशकात रमा नाईक आणि बाबू रेशीमसोबत गवळींनी आपली टोळी (Gang) तयार केली होती. गवळींच्या टोळीने नंतर भायखळा टोळीला संपवून आपले वर्चस्व निर्माण केले. रमा नाईकच्या एन्काउंटरनंतर अरुण गवळींचे दाऊदसोबत वैर वाढले. गवळी यांनी रिअल इस्टेट व्यवसायातून मोठी कमाई केली. २ मार्च २००७ रोजी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती.



योगिता गवळी राजकारणात दाखल


योगिता गवळी पेशाने वकील असून, त्या 'कर फाऊंडेशन'च्या संस्थापिका आहेत. त्यांचा विवाह अभिनेता अक्षय वाघमारे यांच्याशी झाला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्या राजकारणात प्रवेश करत आहेत. अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावर त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.


 
Comments
Add Comment

मत्स्यव्यवसाय विकासासाठी बजेट वाढवा; मंत्री नितेश राणे यांच्याकडे मत्स्यशेतकऱ्यांची मागणी

मुंबई : राज्यातील मत्स्यशेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’

‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

Rain Update : राज्यात २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत मुंबई : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा

२६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत मुंबई : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

मुंबई: शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, मुंबईत मोठ्या संख्येने भाविकांनी शहरातील प्रमुख मंदिरांना भेट दिली,

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आला उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई : मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. यामुळे हैदराबाद