आयआयटी बॉम्बेकडून भारतासाठी ‘स्वदेशी एआय’ची तयारी

भारतीय भाषांसाठी नव्या तंत्रज्ञान युगाची सुरुवात


मुंबई : देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत आयआयटी बॉम्बेने स्वतःची पहिली एआय कंपनी "भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशन"ची स्थापना केली आहे. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रात नोंदणी झालेली ही कंपनी इंग्रजीवर आधारित परदेशी तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन भारतीय भाषांसाठी आणि भारतीय समाजाच्या गरजांसाठी तयार होणाऱ्या स्वदेशी एआय तंत्रज्ञानाचा पाया ठरणार आहे. ही कंपनी आयआयटी बॉम्बेची स्वतःची कंपनी आहे. या निर्णयाने आयआयटी बॉम्बे केवळ एक शिक्षण संस्था न राहता एआय-इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणारा महत्त्वाचा घटक म्हणून उदयाला येत आहे.


भारतजेनचा उद्देश म्हणजे किमान २२ भारतीय भाषांमध्ये काम करणारे मोठे भाषा-मॉडेल (एलएलएम) विकसित करणे हा आहे. मराठी, हिंदी, तमिळ, बंगाली, तेलुगू, पंजाबी, कन्नड, गुजराती यांसह सर्व प्रमुख भाषांचा या मॉडेलमध्ये समावेश आहे. पुढील टप्प्यात कोकणी, वारली, आदिवासी बोली आणि विदर्भातील बोलीभाषाही या एआयमध्ये जोडली जाणार आहे. हा एआय मजकूर, आवाज, दस्तऐवज आणि स्कॅन कागदपत्रंही समजून घेऊ शकेल.भारतीय भाषा वापरू देण्याचं स्वातंत्र्य देणारा प्रकल्प : आज जागतिक बाजारातील बहुतांश एआय इंग्रजीवर आधारित असल्यानं काही भारतीय नागरिकांना सेवा वापरण्यात अडचणी निर्माण व्हायच्या. भारतजेन त्या अडथळ्यावर मात करणार असून या प्रकल्पाचे चार प्रमुख उद्देश निश्चित करण्यात आले आहेत.


"भारतजेन जगातील सर्वात मोठ्या सरकारी मल्टीमॉडल एआय प्रकल्पांपैकी एक ठरत आहे.


प्रकल्पाचे चार मुख्य उद्देश :




  1. भारतासाठी स्वतंत्र, स्वदेशी एआय तयार करणे.

  2. मराठीसह सर्व भाषा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणे.

  3. विद्यार्थ्यांसाठी आणि स्टार्टअप्ससाठी ओपन सोर्स एआय साधने उपलब्ध करणे.

  4. संशोधनासाठी मोठ्या प्रमाणातील भाषा-डेटा उभारणे.

Comments
Add Comment

Bandra : वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये तोडक कारवाईदरम्यान राडा; पोलिसांवर पेव्हर ब्लॉक भिरकावणारा गजाआड

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व येथील 'गरीब नगर' (Garib Nagar) परिसरात सुरू असलेल्या तोडक कारवाईदरम्यान एक अत्यंत

Mumbai Accident : वर्सोवा-जुहू लिंक रोडवर भीषण अपघात; भरधाव बसने अनेक गाड्यांना दिली धडक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा-जुहू लिंक रोडवर एका भरधाव बसने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाचे

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर