वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज, भारतात सूतक काळ लागू होणार की नाही? घ्या जाणून....

मुंबई : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी लागणार आहे, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे, भारतात या ग्रहणाचा सूतक काळदेखील लागू होणार नाही.

ग्रहणाची वेळ


हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री १०:५९ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी पहाटे ३:२३ वाजता संपेल. रात्रीच्या वेळी हे ग्रहण होत असल्यामुळे भारतात ते पाहता येणार नाही.

सूतक काळ


ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण ज्या भागात दिसते, त्याच ठिकाणी सूतक काळ पाळला जातो. हे ग्रहण भारतात दिसत नसल्याने, इथल्या लोकांना सूतक काळाचे नियम पाळण्याची गरज नाही.

हे ग्रहण कुठे दिसणार?


हे सूर्यग्रहण मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका आणि प्रशांत महासागराच्या काही भागांत दिसेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सकाळी सूर्योदयाच्या वेळी हे ग्रहण पाहता येईल.
Comments
Add Comment

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून गौरवणार; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई: ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना

मुंबईत उभारणार मल्टी-मॉडेल टनेल; रस्ते वाहतुकीसोबतच सेवा सुविधांच्या जाळ्यांसाठी असेल स्वतंत्र मार्ग

मुंबई: वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर प्रभावी

मुंबईतील फोर्ट परिसरात आग; बाबेल हॉटेलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर...

मुंबई: मुंबईतील फोर्ट परिसरात आग लागली. ही आग ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांवर लागली. तसेच ती हॉटेल इमारतीच्या

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

चेंबूरमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून मजूर पडल्याने महापौरांनी दिले कडक कारवाईचे आदेश

मुंबई: चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सहा मजूर पडले. या दुर्घटनेत एकाचा

BMC : आयुक्तांची प्रत्यक्ष भेट,सभागृहात नगरसेवकांची गरमागरमी, त्यानंतरही दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दादरसह माटुंगा परिसरातील फेरीवाल्यांवरील