समुद्रात अडकलेल्या लोकांना आता रोबोट वाचवणार!

समुद्रकिनाऱ्यावरील आपत्कालीन परिस्थितीसाठी बीएमसी ६ रोबोटिक बोटी खरेदी करणार 


मुंबई: मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर भरतीदरम्यान अनेक आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असते, आणि त्यासाठी बीएमसीची वॉटर रेस्क्यू टीम ही नेहमी तैनात असतात. मात्र आता, आधुनिक तंत्रज्ञान आणि AI चा जमाना असल्याकारणामुळे, मुंबई महानगरपालिकेत देखील लवकरच रोबोट काम करताना दिसून येणार आहे. जे मुंबई समुद्रात किंवा किनाऱ्यावर आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या लोकांचे जीव वाचवतील.


यासाठी, बीएमसी प्रशासनाने रोबोटिक वॉटर रेस्क्यू सिस्टम स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, ६ रोबोटिक बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



रोबोट खरेदीसाठी नवीन निविदा जारी


या उपक्रमासाठी पूर्वीचा निविदा रद्द करून नवीन निविदा जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये मेक-इन-इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय कंपनीकडून हे रोबोटिक सिस्टम खरेदी केल्या जातील. या पूर्वीच्या निविदेत भारतीय पुरवठादार तुर्कीच्या मारेन रोबोटिक्सकडून सागरी सुरक्षेसाठी सहा रोबोटिक बोटी खरेदी करण्याचा समावेश होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही निविदा काढण्यात आली होती. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षदरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कीयेला धक्का देत बीएमसी प्रशासनाने पूर्वी जारी केलेले निविदा रद्द केले. त्यामुळे, नव्या निविदानुसार भारतीय कंपनीकडूनच बीएसमी रोबोटिक बोटीची खरेदी करणार आहेत. या बोटी मुंबई अग्निशमन दलाला सागरी बचाव कार्यासाठी मदत करतील.  या बोटी गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, गोराई आणि अक्सा समुद्रकिनाऱ्यांवर तैनात केल्या जातील. एका बोटीची किंमत ₹९.६२ लाख इतकी होती. प्रत्येक बोटीची क्षमता २०० किलो असेल आणि कमाल १८ किमी/तास वेग असेल. 


 
Comments
Add Comment

Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम

Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत

- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफ‍िक

Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन

Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.