समुद्रात अडकलेल्या लोकांना आता रोबोट वाचवणार!

समुद्रकिनाऱ्यावरील आपत्कालीन परिस्थितीसाठी बीएमसी ६ रोबोटिक बोटी खरेदी करणार 


मुंबई: मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर भरतीदरम्यान अनेक आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असते, आणि त्यासाठी बीएमसीची वॉटर रेस्क्यू टीम ही नेहमी तैनात असतात. मात्र आता, आधुनिक तंत्रज्ञान आणि AI चा जमाना असल्याकारणामुळे, मुंबई महानगरपालिकेत देखील लवकरच रोबोट काम करताना दिसून येणार आहे. जे मुंबई समुद्रात किंवा किनाऱ्यावर आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या लोकांचे जीव वाचवतील.


यासाठी, बीएमसी प्रशासनाने रोबोटिक वॉटर रेस्क्यू सिस्टम स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, ६ रोबोटिक बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



रोबोट खरेदीसाठी नवीन निविदा जारी


या उपक्रमासाठी पूर्वीचा निविदा रद्द करून नवीन निविदा जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये मेक-इन-इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय कंपनीकडून हे रोबोटिक सिस्टम खरेदी केल्या जातील. या पूर्वीच्या निविदेत भारतीय पुरवठादार तुर्कीच्या मारेन रोबोटिक्सकडून सागरी सुरक्षेसाठी सहा रोबोटिक बोटी खरेदी करण्याचा समावेश होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही निविदा काढण्यात आली होती. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षदरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कीयेला धक्का देत बीएमसी प्रशासनाने पूर्वी जारी केलेले निविदा रद्द केले. त्यामुळे, नव्या निविदानुसार भारतीय कंपनीकडूनच बीएसमी रोबोटिक बोटीची खरेदी करणार आहेत. या बोटी मुंबई अग्निशमन दलाला सागरी बचाव कार्यासाठी मदत करतील.  या बोटी गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, गोराई आणि अक्सा समुद्रकिनाऱ्यांवर तैनात केल्या जातील. एका बोटीची किंमत ₹९.६२ लाख इतकी होती. प्रत्येक बोटीची क्षमता २०० किलो असेल आणि कमाल १८ किमी/तास वेग असेल. 


 
Comments
Add Comment

महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षणावर आल्या फक्त १२९ हरकती सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकी करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती.

महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत पुढे ढकलली, पुढील आठवड्यात जाहीर केली जाणार तारीख

मुंबई (खास प्रतिनिधी): जाहीर करण्यात आलेल्या ४२६ घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी २० नोव्हेंबरला सोडत काढण्यात

व्याजाचा आणि घराच्या रकमेचा परतावा न केल्यास विकासकाला तुरुंगवास

मुंबई : महारेराने एक महत्त्वपूर्ण आणि घरखरेदीदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी

मुंबई : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबई व मुंबई उपनगर

पवई तलावाचा जलपर्णीचा विळखा सुटणार!

मुंबई : पवई तलावात होणारे सांडपाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी आता पवई येथील सध्या बंद असलेल्या पंपिंग

मेट्रो-११ मार्गिकेला मंजुरी

वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचा प्रवास होणार सुलभ मुंबई  : मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा होण्यासाठी