पूनम पांडे होणार मंदोदरी, दिल्लीत रामलीला सुरू होण्याआधी भडकलं महाभारत


नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रम सोमवार २२ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सुरू होत आहे. पण हा रामलीला कार्यक्रम सुरू होण्याआधीच दिल्लीत वेगळं महाभारत भडकलं आहे. याला निमित्त आहे हॉट बेब अशी ओळख मिरवणारी पूनम पांडे. पूनम पांडे दिल्लीच्या रामलीला कार्यक्रमात मंदोदरी ही भूमिका साकारणार आहे. पण पूनमला संधी देण्यावरुन रामलीला समितीमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. काही सदस्यांनी पूनममुळे गर्दी होईल या विचारातून निर्णयाला पाठिंबा दिला आहे तर काही सदस्य निर्णयाला विरोध करत आहेत.


मंदोदरी ही राक्षस राजा रावणाची पत्नी होती. रामायण काळातील सर्वात सुंदर स्त्री असे मंदोदरीचे वर्णन रामायणात आढळते. या तत्कालीन सुंदर महिलेची भूमिका साकारण्यासाठी पूनम पांडे तयारी करत आहे. पण पूनमला रामलीला कार्यक्रमात सहभागी करण्यावरुन वाद भडकला आहे. लव कुश समितीच्या अध्यक्षांनी पूनम पांडे मंदोदरी ही भूमिका साकारणार असे सांगितले. पण रामलीला समितीमध्ये पूनमवरुन सुरू झालेले मतभेद कार्यक्रमाला ४८ तासांपेक्षा कमी कालावधी उरला तरी संपलेले नाहीत.


पूनम पांडेची सोशल मीडियातील प्रतिमा ही रामलीला या कार्यक्रमाशी जुळणारी नाही. यामुळे पूनमला मंदोदरीची भूमिका देऊ नये, असे काही जणांचे मत आहे. त्यांनी मत ठामपणे मांडून पूनमला रामलीला कार्यक्रमात घेण्यास विरोध दर्शविला आहे. आता रामलीला समिती, विश्व हिंदू परिषद आणि समाजातील निवडक मान्यवर यांच्यातील चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.


Comments
Add Comment

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर