PM Modi Address to Nation: पंतप्रधान मोदी आज करणार महत्वपूर्ण घोषणा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५.०० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यात ते अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा संध्याकाळी होणाऱ्या मोदींच्या भाषणावर आहे. यादरम्यान ते महत्वपूर्ण घोषणा देखील करू शकतात. ज्यात उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी दराचा देखील समावेश असेल. तूर्तास, पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या विषयावर कोणतेही अधिकृत विधान अद्याप आलेले नाही.



नव्या जीएसटी दराबद्दल चर्चा


पंतप्रधानांच्या भाषणाच्या विषयाबाबत, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा अंदाज लावला जात आहे की ते जीएसटी सुसूत्रीकरणावर चर्चा करू शकतात. मुळात उद्यापासून नवीन जीएसटी दर २.० देशात लागू होणार आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर मोदी जनतेला संबोधित करण्याची शक्यता आहे. 


भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात घोषणा केली होती की, भावी जीएसटी सुसूत्रीकरणाचे नियम आणि दर दिवाळीपर्यंत लागू होतील. त्यानंतर, जीएसटी परिषदेच्या बैठकीत दोन जीएसटी दर (१२ आणि २८ टक्के) काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २३ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी शुल्क नियम लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केले होते.  आज नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे होणारे  भाषण हे याच मुद्द्यावर असेल, असा अंदाज आहे. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे भाषण 


उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी जनतेला संबोधित करणार आहे. सध्या सणासुदीचा काळ असून या काळात अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे उद्यापासून लागू होणाऱ्या नव्या जीएसटी शुल्क दरानुसार काय महागणार आणि काय स्वस्त होणार? हे जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे. याच कारणामुळे मोदींचे आज नवरात्रीच्या पूर्वसंध्येला होणारे भाषण जनसामान्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.


 
Comments
Add Comment

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

िववाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ