अकरावी प्रवेशाची शेवटची संधी


मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यातील अकरावीची अर्थात FYJC ची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे. आता सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून अकरावीच्या अर्थात FYJC च्या प्रवेशाची अंतिम फेरी सुरू होत आहे. राज्यातील अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेले सुमारे १० हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या निमित्ताने अंतिम संधी मिळेल. यात फेब्रुवारी-मार्च परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या, पण जुलैमधील फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.


यंदा राज्यभरातून १४ लाख ८५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. आतापर्यंत १३ लाख ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. उर्वरित नोंदणी केलेल्या पण कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. या संधीचा वापर करुन संबंधितांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा आणि पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.


अंतिम फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त जागा जाहीर करणे, कोट्याच्या जागा जाहीर करणे, प्रवेशक्षमता वाढवणे आदी प्रक्रिया २२ सप्टेंबर रोजी केल्या जातील. यानंतर २२ आणि २३ सप्टेंबरला नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जाच्या भाग १ मध्ये दुरुस्ती करणे, प्राधान्यक्रम देणे, आदी गोष्टींसाठी मुदत देण्यात आली आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे, ती महाविद्यालये २४ आणि २५ सप्टेंबर या दोन दिवसांत संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रवेशासाठी बोलावतील. महत्त्वाचे म्हणजे २५ सप्टेंबर ही प्रवेशाची अंतिम मुदत असेल. या मुदतीनंतर विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.


Comments
Add Comment

Mayor Ritu Tawde : स्थानिक नागरिकांच्या सूचना आणि संकल्पना लक्षात घेऊन उद्यानांचा विकास करा

- एन विभागातील उद्यान कामांचा महापौर रितू तावडे यांनी घेतला आढावा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील उद्याने ही

BMC News : उपनगरातील महापालिकेच्या ५ रुग्णालयांमध्ये रक्तपेढ्या

- खासगी सहभाग तत्वावर रुग्णालयांमध्ये ब्लड बँककरता संस्थांची निवड मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

Seven Hills Hospital : सेव्हनहिल्स रुग्णालय पुन्हा खासगी संस्थेचाच ताब्यात

- भाडेकरार करण्याचा प्रस्ताव सुधार समितीत सादर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने खासगी सहभाग

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.