अमेरिकेत नोकरीचे स्वप्न आता स्वप्नच राहणार, H-1B व्हिसाचे नियम केले कठोर

वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावत, देशाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न याधीच केला आहे, त्यावर भारत पर्यायी व्यवस्था राबवत अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देत असताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीन एक धक्का दिला आहे. तो म्हणजे,  त्यांनी H-1B व्हिसाच्या नियमातही काही मोठे बदल केले आहेत. ज्यामुळे केवळ भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला त्याचा हादरा बसणार आहे.  तसेच यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न आता स्वप्न राहण्याची चिन्हे आहेत.



H-1B व्हिसाबद्दल धक्कादायक निर्णय


 अमेरिकेत भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात H-1B व्हिसावरच जातात आणि नोकऱ्या करून चांगले पैसे कमावतात. आता H-1B व्हिसासाठी नवीन नियमानुसार मोठे पैसे मोजावी लागणार आहेत. भारत आणि अमेरिकेत अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. मात्र, सध्या टॅरिफच्या मुद्द्यामध्ये दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच तणावात असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता थेट नियमात बदल करण्यात आला आहे.



H-1B व्हिसा धारकांसाठी काय आहेत नवे नियम?


H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत गैर-स्थलांतरित कामगार म्हणून थेट प्रवेश मिळू शकणार नाही. आता नव्या नियमाप्रमाणे नवीन अर्जासाठी $ १००,१०० म्हणजेच भारतीय रुपयांप्रमाणे 88 लाख रुपयांपेक्षाही जास्त शुल्क भरावे लागेल. नवीन $१००,१०० शुल्कामुळे कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ होईल. यामुळे कंपन्या या शक्यतो हे शुल्क टाळण्यासाठी स्थानिक लोकांना कामावर घेण्यासाठी भर देतील.


८ लाख रुपयांचे शुल्क भरण्यासाठी मोठ्या कंपन्यांना फार काही अडचण नक्कीच नसणार आहे. मात्र, छोट्या कंपन्यांसाठी ही नक्कीच मोठी समस्या बनेल.


H-1B व्हिसाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप ट्रम्प सरकारचा असून, त्यामुळेच त्याच्या नियमात बदल करण्यात आला  असल्याचे म्हंटले जातआहे.   अमेरिकेत काम करणारी जास्त करून भारतीय लोक याच व्हिसावर गेलेले आहेत. मात्र, आता नवीन H-1B व्हिसा मिळवणे आणि त्यावर अमेरिकेत जाऊन काम करणे म्हणजे मोठे आव्हान आहे.

Comments
Add Comment

FTA Deal: भारत न्यूझीलंड व्यापारी वाटाघाटीचा तिसरा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

प्रतिनिधी:भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीं चा तिसरा टप्पा शुक्रवारी न्यूझीलंडमधील

‘ॲप’टॅक्सी भाडे प्रति किमी २२.७२ रुपये

‘ॲप’टॅक्सी भाडे प्रति किमी २२.७२ रुपये मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी मुंबई (प्रतिनिधी): अॅप आधारित

खड्ड्यांमुळे राज्यात आतापर्यंत १२ मृत्यू

खड्ड्यांसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरा : उच्च न्यायालय मुंबई (प्रतिनिधी): रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या

सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर

सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट

मोठी बातमी: भारत २०३०-३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था होणार जर.....

S&P Global रिसर्चचा मोठा दावा मोहित सोमण: जर वार्षिक ६.७% वाढीचा दर कायम राहिल्यास भारत आर्थिक वर्ष २०३० ते २०३१ मध्ये

दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडी सुटणार! महालक्ष्मी रेल्वे ट्रॅकवर बांधला जात आहे एक अनोखा ओव्हरब्रिज

महालक्ष्मी रेल्वे ट्रॅकवर शहरातील पहिला केबल-स्टेड पूल मुंबई: दक्षिण मुंबईतील स्थानिकांसाठी तसेच कामानिमित