सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर

सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम


मुंबई (प्रतिनिधी) :
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या सहा महिन्यांत ४०.८१ लाख मतदारांची वाढ झाल्याबाबत विरोधकांकडून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, ही वाढ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम करणारी ठरणार आहे.
२७ नोव्हेंबर २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत राज्यातील मतदारांची संख्या ९,७०,२५,११९ वरून ९,८४,९६,६२६ इतकी झाली आहे. म्हणजेच एकूण १८,८०,५५३ नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे. याचदरम्यान ४,०९,०४६ जुन्या मतदारांची नावे वगळण्यात आली असून, अंतिमतः एकूण १४,७१,५०७ मतदारांची वाढ झालेली आहे. गेल्या निवडणुकांदरम्यान मतदार यादीतील आकडेवारीवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांनी मात्र या नवीन वाढीव मतदारांविषयी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार निवडणूक आयोगाकडे नोंदवलेली नाही.


डिजिटल स्वरूपात मतदारयादी उपलब्ध
नवीन मतदारयादी मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होती, मात्र त्यावर कोणाच्या हरकती अद्याप आल्या नसल्याचेही समजते. नवीन मतदारयादी केंद्रीय निवडणूक कार्यालयाने आयोगाला मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत 'डिजिटल' स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.


घरबदलामुळेही मोठ्या प्रमाणावर नोंदणी
या नव्या मतदारांपैकी १.९६ लाख मतदार हे घरबदलामुळे म्हणजेच एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर झाल्यामुळे नव्याने नोंदले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक वाढ पुणे (३२,०३१), ठाणे (२७,३८६), आणि मुंबई उपनगर (२५,८३१) या जिल्ह्यांमध्ये झाली आहे.


सर्वाधिक मतदार वगळलेले पाच टॉपचे जिल्हे
ठाणे : ४५ हजार ८००.
मुंबई उपनगरे : ४४ हजार १७२.
पुणे : ४३ हजार ९६१.
नाशिक : ३५ हजार ४७९.
जळगाव : २६ हजार ६३९.
सर्वाधिक मतदार वाढलेले पाच टॉपचे जिल्हे
ठाणे : २ लाख २५ हजार ८६६.
पुणे : १ लाख ८२ हजार ४९०.
पालघर : ९७ हजार १००.
मुंबई उपनगरे : ९५ हजार ६३०.
नागपूर : ७० हजार ६९३.


सर्वाधिक मतदार असलेले टॉपचे पाच जिल्हे
पुणे :
९० लाख ३२ हजार ८०.
मुंबई उपनगरे :
७७ हजार ८१ हजार ७२८.
ठाणे :
७४ लाख ५५ हजार २०५.
नाशिक :
५१ लाख २८ हजार ९७४.
नागपूर :
४५ लाख ९६ हजार ६९०.

Comments
Add Comment

Suryakumar Yadav : टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्सची साथही सोडणार? सूर्यकुमार यादवच्या भविष्याबाबत चर्चांना उधाण

MUMBAI: भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय

Suicide News : अटल सेतूवरून तरुणाची समुद्रात उडी; युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू

नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) अटल सेतू पुलावरून (Atal Setu Bridge) एका २८ वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक

Dadar Bus Accident : दादरमध्ये भीषण अपघात! भरधाव बसचा कहर; ३ बाईक, टॅक्सी आणि ओला-उबेरला धडक, एकाचा मृत्यू, अनेक जखमी

मुंबई : दादर येथील प्लाझा परिसरात सोमवारी भीषण अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली. भरधाव वेगाने आलेल्या एका बसने तीन

MahaDBT Students Scheme : मोठ्या शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये मिळणार; कोण पात्र? जाणून घ्या

मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये उच्च शिक्षण (Higher Education) घेणे अनेक

Goregaon-Mulund Link Road (GMLR) : दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूल १५ जुलैपर्यंत होणार खुले?

मुंबई : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान

Online Fraud : ॲपच्या नादात फ्लॅट पडला महागात ....

मुंबई : मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्या हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण वाढत्या महागाईमुळे