सौदी अरेबियासोबतच्या नवीन करारानंतर पाकड्या हवेत! भारताविरुद्ध ओकळी गरळ

भारतासोबत युद्धासारखी परिस्थिती उद्भवली तर सौदी अरेबिया पाकिस्तानचे रक्षण करेल, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान


इस्लामाबाद : पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये नुकताच संरक्षण करार झाला आहे, ज्याच्या जिवावर पाकिस्तानचे मंत्री पुन्हा एकदा माकड उड्या मारू लागले आहेत. त्याचे एक पहिले उदाहरण म्हणजे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक भारताविरुद्ध एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकारांना सांगितले की, जर भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले तर सौदी अरेबिया पाकिस्तानचे रक्षण करेल. ते म्हणाले की, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील अलीकडील करारात सामरिक परस्पर मदतीची तरतूद समाविष्ट आहे.


ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानी चॅनेल जिओ टीव्हीशी बोलताना या कराराची तुलना नाटोच्या कलम ५ शी केली, ज्यामध्ये 'सामूहिक संरक्षण' हे तत्व लागू होते. याचा अर्थ असा की जर कोणत्याही सदस्य देशावर हल्ला झाला तर तो सर्व सदस्य देशांवर हल्ला मानला जातो. सौदी अरेबियासोबतचा हा करार आक्रमक नसून बचावात्मक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


नाटोचे उदाहरण देत ते म्हणाले की जर कोणावरही, मग तो पाकिस्तान असो वा सौदी अरेबिया, हल्ला झाला तर दोन्ही देश एकत्रितपणे त्याचा सामना करतील. वृत्तानुसार, ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केले की हा करार कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी वापरण्याचा हेतू नाही. जर पाकिस्तान किंवा सौदी अरेबियाला कोणताही धोका निर्माण झाला तर ही व्यवस्था आपोआप लागू होईल.



पाकिस्तानची अण्वस्त्रे सौदी अरेबियाच्या वापरासाठी उपलब्ध


पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, पाकिस्तानची अण्वस्त्रे सौदी अरेबियाच्या वापरासाठी उपलब्ध राहतील. त्यांनी स्पष्ट केले की, या नवीन कराराअंतर्गत पाकिस्तान सौदी अरेबियासोबत आपल्या क्षमता सामायिक करण्यास तयार आहे. आसिफ यांनी असेही म्हटले की, पाकिस्तानने नेहमीच आपल्या अण्वस्त्र सुविधांवर देखरेख ठेवण्याची परवानगी दिली आहे आणि कधीही कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही.


या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या रियाध दौऱ्यादरम्यान पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली आहे. ज्याचा थेट परिणाम भारतावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



पाकिस्तान आणि सौदी अरेबिया कराराबद्दल भारतीय तज्ञांचे मत


या कराराबद्दल भारत सरकारने असे म्हटले की हा करार दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संरक्षण व्यवस्थेला औपचारिकता प्रदान करतो. तसेच त्याचे परिणाम विश्लेषण सध्या केले जात आहेत. दरम्यान, लष्करी आणि राजकीय तज्ञांनीदेखील या कराराबद्दल आपले मत व्यक्त केले आहेत. त्यांनी नमूद केले की हा करार सौदी अरेबियाच्या आर्थिक संसाधनांना पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाशी जोडतो आणि दोन्ही देशांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पण या करारामुळे भारताच्या संरक्षण प्राणलीवर कोणत्याही प्रकारचा धोका उत्पन्न होईल असे वाटत नाही.

Comments
Add Comment

Iran-US War News : ओमान किनाऱ्याजवळ तेलवाहू जहाजावर भीषण हल्ला; जहाजावर होते भारतीय कर्मचारी

ओमान : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या समुद्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओमानच्या

पीओकेमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले; 21 सैनिकांचा मृत्यू

Pakistan Army Helicopter Crash : पाकव्याप्त काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकव्याप्त मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तानच्या

West Asia War : पश्चिम आशियात तणाव पुन्हा वाढला: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे बहरीन आणि जॉर्डनमध्ये क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ले

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणचे सैन्य पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही देशांनी पुन्हा एकदा

London Marathi Family Death : लंडनमध्ये मराठी दाम्पत्य आणि मुलाचा मृत्यू; तपासात समोर आली धक्कादायक माहिती

लंडन : ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये (London) एका मराठी कुटुंबाच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भारतीय वंशाचे

POK : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये हिंसा

आंदोलक-सुरक्षा दल संघर्षात ३० ठार, २०० हून अधिक जखमी रावलकोट : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलनाला

Oman-Gujarat deep-sea pipeline : होर्मुजची कोंडी फुटणार! ३० वर्षांपासून रखडलेला...'ओमान ते गुजरात' पाईपलाईन प्रकल्प भारत मार्गी लावणार!

सध्या पश्चिम आशिया (Middle East) युद्धाच्या आणि तणावाच्या छायेत आहे. या वाढत्या अस्थिरतेमुळे जगभरात इंधनाच्या संकटाची