पीएमपीएमएलची पानशेत पर्यटन बससेवा

जंगल सफारीचे विशेष आकर्षण


पुणे : पीएमपीएमएलने पुणेकरांच्या आग्रहास्तव पानशेत पर्यटन बससेवा सुरू केली आहे. ही दिवसाची पर्यटन सहल आहे, पर्यटकांना पानशेत धरण परिसरासह आसपासच्या निसर्गरम्य स्थळांना भेटीचा आनंद देत आहे. वातानुकूलित बस, प्रशिक्षित गाईड, साहसी खेळ, धबधबे व बोटिंगचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे. अगदी कमी खर्चात निसर्ग अनुभता येणार आहे. या बससेवेअंतर्गत ५०० रुपयांच्या तिकीटामध्ये ही सेवा दिली जाते. या सेवेचे विशेष आकर्षण जंगल सफारी आहे.


पानशेत बससेवेच्या मार्गावर एडव्हेंचर मावळ, वरसगावचा धबधबा, पक्षी संग्रहालय, पानशेत येथे बोटिंगचा आनंद आणि खडकवासला धरण यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. पर्यावरणपूरक आणि आरामदायी वातानुकूलित (एसी) बसमुळे पर्यटकांचा प्रवास आणखी सुखकर होतो. पीएमपीएमएलने अलीकडेच ही बससेवा सुरू केली आहे.


या सेवेच्या माहितीसाठी आणि बसचे वेळापत्रक तपासण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा सोशल मीडियावर पीएमपीएमएलच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही माहिती घेऊ शकता. जवळच्या बस स्थानकावर चौकशी करून अधिक माहिती मिळवता येऊ शकते.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर