कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली, आत्महत्येचा विचार करत होते? ९१ वर्षीय वडिलांकडून चौकशीची मागणी

एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा! मृत वैमानिक सुमित सभरलवाल यांच्या वडिलांचा आरोप


नवी दिल्ली: अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल अपूर्ण आणि दिशाभूल करणारा आहे, असा आरोप मृत वैमानिक सुमित सभरवालचे ९१ वर्षीय वडील पुष्कराज सभरवाल यांनी केला आहे. या अहवालामुळे माझ्या मुलाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची नव्याने औपचारिक चौकशी करावी, अशी मागणी सबरवाल यांनी विमान अपघात चौकशी ब्युरोकडे (AAIB) केली आहे.


अहमदाबाद विमानतळावर १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विमानातील २४१, तर अन्य १९ जणांचा मृत्यू झाला होता. जुलै महिन्यात एएआयबी अर्थात विमान अपघात चौकशी ब्युरोने प्राथमिक अहवाल प्रसिध्द केला होता. या अहवालात वैमानिक सुमित सभरवाल यांच्याबद्दल चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप त्यांचे वडील पुष्कराज सभरवाल यांनी केला आहे. तसेच हा अहवाल अपूर्ण आणि विसंगत असल्याचा दावा करत, या संपूर्ण प्रकरणाची नव्याने औपचारिक चौकशी करावी, अशी मागणी सबरवाल यांनी एएआयबीकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. या अहवालावर दुर्घटनाग्रस्त विमानाचे वैमानिक सुमित सभरलवाल यांचे वडील पुष्कराज सभरवाल यांनी नाराजी व्यक्त केली. या अहवालात उत्पादक कंपन्यांना (बोईंग व जनरल इलेक्ट्रिक) दोषमुक्त केल्याचे दिसून येत आहे.



कॅप्टन सुमित सभरवाल बद्दल अहवालात चुकीची माहिती


अहवालात कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली असून, आत्महत्येचा विचार करत होते असे म्हटले होते. त्यामुळे माझ्या मुलाची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच माझ्याही आरोग्यावरही परिणाम झाल्याचे सभरवाल यांनी म्हटले आहे.



कॅप्टन सभरवाल यांच्या नैराश्याचे आरोप फेटाळले


सुमित सभरवाल यांचा घटस्फोट १५ वर्षांपूर्वीच झाला होता. तसेच त्यांच्या आईचे निधन तीन वर्षांपूर्वी झाले होते. त्यानंतर सुमित यांनी १०० हून अधिक उड्डाणे कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण केली होती. त्यामुळे नैराश्य हा मुद्दा निराधार पुष्कराज सभरवाल यांचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत कधीही अपघात किंवा गंभीर घटना घडलेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


या सर्व करणांमुळे पुष्कराज सभरवाल यांनी केंद्र सरकारकडे औपचारिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्याची मागणी केली असून, त्यात तज्ज्ञ व वैमानिक प्रतिनिधींचाही समावेश असावा असे म्हटले.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च