मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सात जणांना उच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सात जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. एनआयए न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात पीडितांनी आणि त्यांच्या नातलगांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीवेळी दोन्ही बाजू जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सात जणांना नोटीस बजावली आहे.


एनआयएच्या विशेष न्यायालयाने ३१ जुलै २०२५ रोजी साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेधी, अजय रहीरकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ शंकराचार्य आणि समीर कुलकर्णी यांची निर्दोष सुटका केली. आता या सर्वांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.


मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी भीकू चौकात बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एनआयएने तपास केला आणि ज्यांना अटक करुन आरोपी म्हणून न्यायालयात हजर केले त्या सात जणांची निर्दोष सुटका झाली. एनआयएच्या विशेष न्यायालयाने आरोपींविरोधात पुरावे नसल्याचे सांगत निर्णय दिला. या निर्णयाला पीडितांनी आणि त्यांच्या नातलगांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. लवकरच मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.


राज्याचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अखंड यांच्या खंडपीठाने निसार अहमद हाजी सैय्यद बिलाल, शेख लियारत मोहिउद्दीन, शेख इसहाक शेख युसुफ, उस्मान खान ऐनुल्लाह खान, मुश्ताक शाह हारून शाह आणि शेख इब्राहिम शेख सुपडो यांची याचिका दाखल करुन घेतली. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सात जणांना तसेच एनआयएला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलाला त्यांची याचिकेशी संबंधित सर्व कागदपत्रे दोन आठवड्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. कुणीही निर्दोष सुटका झालेल्यांविरोधात याचिका दाखल करावी यासाठी हा दरवाजा खुला नाही असे सांगत तपासादरम्यान तपास यंत्रणांनी मृतांच्या नातलगांची विचारपूस करत चौकशी केली होती का ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. मालेगाव प्रकरणात पुढील सुनावणी सहा आठवड्यांनंतर आहे.

Comments
Add Comment

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी