Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड शहरातील एका भीषण अपघातामुळे (Accident) महामार्ग असो वा राज्य रस्ता, गतीमर्यादा ओलांडणे, ड्रंक अँड ड्राईव्ह, बेफाम ओव्हरटेक किंवा रस्त्यांची दयनीय अवस्था या सगळ्या कारणांनी अपघातांचे प्रमाण वाढत आहे. मुखेड शहरात सोमवारी एक विचित्र अपघात घडला. ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना धडक बसली. या घटनेत तब्बल ७ ते ८ जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. सर्व गंभीर जखमींना तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. ट्रकचा ब्रेक फेल होण्यामागचं खरं कारण नेमकं काय हे तपासात स्पष्ट होणार आहे.



मुखेडच्या बाराहाळी नाक्यावर ट्रकचा ब्रेक फेल


नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरातील बाराहाळी नाका परिसरात सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका काळ्या-पिवळ्या जीपला ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की जीप जागेवरच पलटी झाली. याचबरोबर ट्रकने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या तब्बल ५ ते ६ मोटरसायकल चिरडल्या. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली. घटनेत एकूण ७ ते ८ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


अपघातानंतर काही काळ बाराहाळी नाका परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या अपघाताचा अधिक तपास सुरू असून ट्रकचा ब्रेक फेल होण्यामागचं नेमकं कारण शोधले जात आहे.

Comments
Add Comment

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती मुंबई :

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५