मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर


मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा अखेर मुहूर्त सापडल्याने मुंबई ते कोकण हा प्रवास आता सुकर होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर रो-रो फेरीसेवा सुरू होण्याची शक्यता असल्याने कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई ते कोकण यादरम्यान प्रवासी व वाहनांसाठीची रो-रो फेरीसेवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी सुरू असून, सागरी महामंडळाने कंबर कसली आहे.


काही महिन्यांपासून केंद्र व राज्यस्तरीय परवानग्या, हवामान अडथळे आणि तांत्रिक कारणांमुळे ही सेवा वारंवार पुढे ढकलली जात होती. गणेशोत्सवात ही सेवा सुरू होईल, अशाप्रकारे नियोजन सुरू होते, मात्र आता सर्व परवानग्या मिळाल्या असून, समुद्रस्थितीही अनुकूल होत आहे. .


सागरी महामंडळाने बोटीची सेवा सुरुवात करण्यासाठी तांत्रिक व प्रशासनिक तयारी पूर्ण केली आहे. जेट्टीवर प्रवाशांसाठी बैठकीची सोय, वाहनांसाठी स्वतंत्र लोडिंग-विचार केंद्र, तसेच सुरक्षित उतार व चढाव यासाठी योग्य उपाययोजना केली जात आहे. जयगड आणि विजयदुर्ग येथे जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच हवामान अहवालावर नजर ठेवून समुद्रस्थिती अनुकूल असल्यास ताबडतोब सेवा सुरू करण्याचे प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. सणासुदीच्या काळात हजारो प्रवासी कोकणात आपल्या गावी जाण्यास निघतात. महामार्गावर तासनतास होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, रेल्वेत तिकिटासाठीची धावपळ यामुळे प्रवास त्रासदायक ठरत होता. रो-रो सेवेमुळे सुरक्षित, जलद व आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. गणेशोत्सवात सेवा न मिळाल्याने नाराजी होती, पण नवरात्रोत्सवात ही सेवा सुरू होणार असल्याचे ऐकून आम्हाला आनंद झाला आहे. मुंबई ते कोकण प्रवासाला नवा पर्याय मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.


काही महिन्यांपासून केंद्र व राज्यस्तरीय परवानग्या, हवामान अडथळे व तांत्रिक कारणांमुळे ही सेवा वारंवार पुढे ढकलली जात होती. गणेशोत्सवात ही सेवा सुरू होईल, अशाप्रकारे नियोजन सुरू होते. तेव्हा तांत्रिक कारणांमुळे ही सेवा सुरू झाली नाही. आता सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून हवामानही स्थिर आहे.


सेवा कशी असेल?


भाऊचा धक्का (मुंबई) येथून जयगड आणि विजयदुर्गपर्यंत या बोटी धावणार आहेत.
प्रवास वेळ : मुंबई - रत्नागिरी ३ ते ३.५ तास, मुंबई-सिंधुदुर्ग ५ तास
वेग : २५ नॉट्स दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट


यशस्वी चाचणी
मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मार्गावर रो-रो सेवेची प्रायोगिक चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. वेग, प्रवासी क्षमता व सुरक्षा तपासणी समाधानकारक ठरली असून, सागरी सुरक्षा यंत्रणांकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे.


आसन क्षमता
५५२ प्रवासी (इकोनॉमी )
४४ (प्रीमियम इकोनॉमी)
४८ (बिझनेस)
१२ (फर्स्ट क्लास)


वाहन क्षमता
५० चारचाकी व ३० दुचाकी


तिकीटदर




  • इकोनॉमी - २,५०० रु.

  • प्रीमियम इकोनॉमी - ४,००० रु.

  • बिझनेस - ७,५०० रु.

  • फर्स्ट क्लास - ९००० रु.

  • वाहनांचे दर

  • चारचाकी - ६००० रु.

  • दुचाकी - १००० रु.

  • सायकल - ६०० रु.

  • मिनी बस - १३,००० रु

Comments
Add Comment

Bombay High Court : ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याकडे एकटक बघणं गुन्हा पण... मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई : कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे निरखून पाहणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आणि अत्यंत

Mumbai Local : आता लोकलमध्ये लटकून प्रवास करता येणार नाही , लवकरच...

मुंबई : मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करताना अनेक समस्यांना सामोर जावं लागतं. नुकताच मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून

Megablock Update : मुंबईकरांना रविवारी पुन्हा मेगाब्लॉकचा फटका; प्रवाशांची मोठी गैरसोय

मुंबई : मुंबईतील लोकल प्रवाशांना रविवारी पुन्हा एकदा मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेकडून विविध

Ashok Kharat Case, Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका?

 भोंदू अशोक खरात प्रकरणात नवी तक्रार; बीडमधील व्यक्तीचा 'एसआयटी'कडे खळबळजनक दावा मुंबई : नाशिकमधील भोंदू अशोक

Bmc News, Vashi Gateway : वाशी प्रवेशद्वाराला मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव प्रतिष्ठानने केली महापौरांकडे मागणी

मुंबई : मुंबईच्या महापौरांच्या संकल्पनेतून मुंबईतील प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण आणि घड्याळ बसण्याचे काम हाती

Bmc News : वांद्र्यातील नवपाडा, घासबाजारमधील तुंबणाऱ्या पाण्याचा मार्ग मोकळा

दक्ष सहायक आयुक्तांमुळे रेल्वेला करावी लागली कल्व्हर्टची सफाई मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात