मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल करण्यात आलेली स्थगिती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सुभाष कपूर दिग्दर्शित हा कोर्टरूम ड्रामा १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


'असोसिएशन फॉर एडिंग जस्टिस' या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, चित्रपटामध्ये वकिलांबरोबरच न्यायाधीशांचीही थट्टा केली आहे. विशेषतः "भाई वकील है" या गाण्याला विरोध करत, कायदेशीर व्यवसायाची प्रतिमा मलीन केल्याचा दावा करण्यात आला.


सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील दीपेश सिरोया यांनी असा मुद्दा उपस्थित केला की एका दृश्यात न्यायाधीशांना "मामू" असे संबोधले गेले आहे, जे त्यांच्या मते अपमानास्पद आहे. मात्र, मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. "आम्ही सुरुवातीपासूनच विनोद सहन करत आलो आहोत. आमचं काही बिघडत नाही," असे म्हणत त्यांनी याचिका फेटाळली.


या आधीही अलाहाबाद उच्च न्यायालयात अशाच प्रकारची एक याचिका दाखल झाली होती, जी तेथेही फेटाळण्यात आली आहे, अशी माहिती कोर्टासमोर मांडण्यात आली.


दरम्यान, इतर राज्यांमध्येही या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका वकिलाला निर्मात्यांना पक्ष न बनवताच याचिका दाखल केल्याबद्दल सुनावले आहे, तर गुजरात उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला आधी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे.


या सर्व घडामोडी असूनही, 'जॉली एलएलबी ३' नियोजित तारखेनुसार म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय