दादरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने समाजकंटकांचं धक्कादायक कृत्य

मुंबई : मध्य मुंबईत दादर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकून पुतळा विद्रूप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने काही समाजकंटकांनी ही कृती केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तसेच संपूर्ण दादरमध्ये बंदोबस्त वाढवला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यांचा शोध सुरू आहे. पोलीस बंदोबस्तात पुतळ्यावर फेकण्यात आलेला रंग काढून पुतळा तसेच भोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार घडल्याचे कळताच शिवसैनिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राज्यसभा खासदार खासदार अनिल देसाई, स्थानिक आमदार महेश सावंत यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतः जाऊन पुतळ्याचे अवलोकन केले. उद्धव ठाकरे गटाने पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. भेकड्यांच्या औलादींना प्रत्युत्तर देऊ, असे राज्यसभा खासदार खासदार अनिल देसाई म्हणाले.

याआधी काही वर्षांपूर्वी काँग्रेस आघाडी सत्तेत असताना मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला विद्रूप करण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी मुंबईत हिंसक घटना घडल्या होत्या. सार्वजनिक संपत्तीची हानी झाली होती. यामुळे पोलीस आवश्यक ती खबरदारी घेत आहेत.
Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी