दादरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने समाजकंटकांचं धक्कादायक कृत्य

मुंबई : मध्य मुंबईत दादर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकून पुतळा विद्रूप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने काही समाजकंटकांनी ही कृती केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तसेच संपूर्ण दादरमध्ये बंदोबस्त वाढवला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यांचा शोध सुरू आहे. पोलीस बंदोबस्तात पुतळ्यावर फेकण्यात आलेला रंग काढून पुतळा तसेच भोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार घडल्याचे कळताच शिवसैनिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राज्यसभा खासदार खासदार अनिल देसाई, स्थानिक आमदार महेश सावंत यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतः जाऊन पुतळ्याचे अवलोकन केले. उद्धव ठाकरे गटाने पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. भेकड्यांच्या औलादींना प्रत्युत्तर देऊ, असे राज्यसभा खासदार खासदार अनिल देसाई म्हणाले.

याआधी काही वर्षांपूर्वी काँग्रेस आघाडी सत्तेत असताना मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला विद्रूप करण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी मुंबईत हिंसक घटना घडल्या होत्या. सार्वजनिक संपत्तीची हानी झाली होती. यामुळे पोलीस आवश्यक ती खबरदारी घेत आहेत.
Comments
Add Comment

Indigo Flight Cancellations : इंडिगोच्या गोंधळामुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, असे करा प्रवासाचे नियोजन किंवा मिळवा रिफंड

मुंबई : देशातील सर्वात स्वस्त विमानसेवा म्हणून मिरवणाऱ्या इंडिगो कंपनीची आठवड्याभरात काही हजार उड्डाणं रद्द

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आयोगाने जाहीर केल्या नव्या तारखा

मुंबई : एमपीएससीची २१ डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आयोगाने नव्या तारखा जाहीर करून

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची