पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा केली. त्याचबरोबर विविध विकासकामांचे उद्घाटन केले. हे अभियान राबविण्यामागचा मुख्य हेतू महिलांना विविध योजनांचा लाभ मिळावा हे आहे.


मध्य प्रदेशातील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, विकसित भारताचे चार स्तंभ आहेत, ते म्हणजे महिला, युवा, गरीब आणि शेतकरी. भारताच्या विकासाचा पाया 'नारी शक्ती' आहे. यासाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे सुरू केले आहे. घरातली आई हा घराचा मुख्य कणा आहे. जर ती स्वस्थ व निरोगी असेल तर संपूर्ण घर सशक्त व कणखर बनते. घरातील स्त्री निरोगी आणि सशक्त व्हावी यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे.


 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये महिलांना प्रथम प्राधान्य दिले आहे. याचबरोबर राज्यातील ८ वे राष्ट्रीय पोषण महा अभियान सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आदी सेवा पर्वाच्या पायाभरणीमुळे कापड उद्योग त्याचबरोबर राज्यातील युवांना नोकरीची संधी उपलब्ध होईल, असेही पंतप्रधान भाषणात संबोधित करताना म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात भारतीय जनता पक्षाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजपाकडून आठवडा सेवा पखवाडाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवविले जाणार आहेत.

Comments
Add Comment

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या