पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा केली. त्याचबरोबर विविध विकासकामांचे उद्घाटन केले. हे अभियान राबविण्यामागचा मुख्य हेतू महिलांना विविध योजनांचा लाभ मिळावा हे आहे.


मध्य प्रदेशातील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, विकसित भारताचे चार स्तंभ आहेत, ते म्हणजे महिला, युवा, गरीब आणि शेतकरी. भारताच्या विकासाचा पाया 'नारी शक्ती' आहे. यासाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे सुरू केले आहे. घरातली आई हा घराचा मुख्य कणा आहे. जर ती स्वस्थ व निरोगी असेल तर संपूर्ण घर सशक्त व कणखर बनते. घरातील स्त्री निरोगी आणि सशक्त व्हावी यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे.


 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये महिलांना प्रथम प्राधान्य दिले आहे. याचबरोबर राज्यातील ८ वे राष्ट्रीय पोषण महा अभियान सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आदी सेवा पर्वाच्या पायाभरणीमुळे कापड उद्योग त्याचबरोबर राज्यातील युवांना नोकरीची संधी उपलब्ध होईल, असेही पंतप्रधान भाषणात संबोधित करताना म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात भारतीय जनता पक्षाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजपाकडून आठवडा सेवा पखवाडाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवविले जाणार आहेत.

Comments
Add Comment

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते