मुंबईत पावसाचे टार्गेट पूर्ण, आतापर्यंत तब्बल १०३ टक्के पावसाची नोंद


मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील जनता सुखावली आहे. वाढत्या उष्म्यामुळे पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना हा पाऊस सुखावणारा ठरत असला तरी अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे तुंबणाऱ्या पाण्यांमुळे तो डोकेदुखीचाही ठरला आहे. त्यामुळे आता येरे पावसा ऐवजी जारे जारे पावसा महणण्याची वेळ मुंबईकरांवर आली असली तरी प्रत्यक्षात मुंबईतील पावसाचे टार्गेट मात्र पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत मुंबईत सरासरी १०३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.


मुंबई वार्षिक सरासरी २२०० मिमी एवढा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जातो. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार शहरांत २०९५ मिमी एवढा वार्षिक पावसाचा अंदाज होता, तर सांताक्रुझ वेधशाळेच्या अंदाजानुसार वार्षिक २३१९ मिमी एवढा पावसाचा अंदाज होता. वेधशाळेच्या अंदाजानुसार १५ सप्टेंबरपर्यंत शहरांमध्ये १८८०.०७मिमी आणि उपनगरांमध्ये २८१७.०५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वेधशाळेने अंदाजित केलेल्या वार्षिक पावसाच्या अंदाजानुसार शहरांत आतापर्यंत ८९.७७ टक्के एवढा पाऊस नोंदला गेला आहे, तर उपनगरांमध्ये १२१.५० टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये शहरामध्ये ९५.३३ टक्के आणि उपनगरांत १००.३१ टक्के पाऊस नोंदला गेला होता.


तसेच महापालिकेच्यावतीने मुंबईत अनेक ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य बलमापन यंत्र बसवली आहे. या पर्जन्य मापनावरी नोंदीनुसार आतापर्यंत शहरांमध्ये १९५० मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला असून याची टक्केवारी ९३.१२ आहे. तर पूर्व उपनगरांत २४४०.०४ मिमी आणि पश्चिम उपनगरांत २४१७.४४ मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामुळे उपनगरांमध्ये १०४.७३ टक्के एवढा पाऊस पडला आहे. त्यामुळे महापालिकेच्या पर्जन्य जलमापनांवरील नोंदीनुसार संपूर्ण मुंबईत १०२.८३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.


मात्र, यंदा शहरापेक्षा उपनगरांतच सवाधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदाही १५ दिवस आधीच उपनगराने पावसाचा टप्पा पार केला आहे; परंतु संपूर्ण मुंबईचा विचार केल्यास आतापर्यंत १०२.८३ टक्के पावसाची नोंद झाल्याचे दिसून येते.


Comments
Add Comment

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल

Jay Pawar : जय पवारांची मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राला भेट

मुंबई, महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य