आणखी एका मेट्रो स्थानकाचे नामकरण : ‘अथर्व युनिव्हर्सिटी – वळणई मीठ चौकी’

मुंबई : उत्तर मुंबईतील कांदिवली मालाड दरम्यानच्या वळणई - मीठ चौकी मेट्रो स्थानकाचे औपचारिक नामकरण “अथर्व युनिव्हर्सिटी - वळणई मीठ चौकी” असे करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या हस्ते हे नामकरण करण्यात आले.


या समारंभात बोलताना पीयूष गोयल यांनी अथर्व युनिव्हर्सिटीचे संस्थापक व कुलापती सुनील राणे यांचे अभिनंदन करत सांगितले, मी अथर्व ग्रुपचे अभिनंदन करतो. यंदा संस्थेला युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी हे मेट्रो स्थानक दत्तक घेतले आहे. यामुळे लाखो प्रवाशांना संस्थेची ओळख होईल आणि तरुणाईला शिक्षणासाठी प्रेरणा मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.


त्यांनी पुढे सांगितले की, अथर्व युनिव्हर्सिटीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारी सुविधा उपलब्ध आहे. कौशल्य विकासासाठी ही संस्था मोलाचे कार्य करते.


या नामकरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पीयूष गोयल उपस्थित होते. त्यांच्या सोबत व्यासपीठावर अथर्व युनिव्हर्सिटीचे कुलपती सुनील राणे, उपाध्यक्षा वर्षा राणे, साईन पोस्ट इंडियाचे श्रीपाद अष्टेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबईकरांनी दिवाळीत फटाक्यांसह केला कचरा, महापालिकेने तब्बल ३,००० टन जमा केला..

मुंबई (खास प्रतिनिधी): दीपावलीच्या पूर्वी करण्यात आलेली साफसफाई आणि या सणाच्या काळात भेटवस्तू तसेच फटाक्यांचा

हवामान खात्याचा महाराष्ट्राला आज आणि उद्यासाठी पावसाचा इशारा

मुंबई : यंदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अती पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिकं वाहून गेली. केंद्र

आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या मोहम्मद सलीम शेखला दुबईतून अटक, मुंबई पोलीस क्राइम ब्रॅंचची मोठी कामगिरी!

मुंबई: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश

मध्य रेल्वेचा ९ दिवस मेगाब्लॉक! 'या' स्थानकांदरम्यान वाहतूक राहणार बंद, लांबपल्ल्याच्या लोकल ट्रेनला फटका

मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या