मोदींच्या वाढदिवशी ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना मिळणार गिफ्ट


दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीतील ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेशी जोडले जाणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता मांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रविवारी (१४ सप्टेंबर) जाहीर झालेल्या ३ कल्याणकारी योजनांविषयी रेखा गुप्ता यांनी माहिती दिली.


योजनेशी जोडले जाण्याकरीता पेन्शनधारकांना ई-जिल्हा पोर्टलद्वारे अर्ज सादर करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. पेन्शन योजनेतील लाभाथ्यांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सर्व पात्र ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभघेण्यासाठी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.


चालू आर्थिकवर्षांमध्ये या योजनेसाठी तब्बल १४९ कोटी रुपयांचे बजेट वाटप करण्यात आले असल्याचे रेखा गुप्ता यांनी सांगितले. नव्या पेन्शन योजनेमुळे ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे जीवन सन्मानाने जगता यावे यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या. भविष्यात लाभाष्यांची संख्या वाढली आणि अतिरिक्त निधीची आवश्यकता भासली, तर सरकार विलंब न करताअतिरिक्त अर्थसंकल्पीय मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिली.


दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पेन्शन योजनेशी संबंधित घोषणा केली होती. ६० ते ६९ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक मदत २००० रुपयांवरून २,५०० रुपये करण्यात येत आहे आणि आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना २,५०० रुपयांवरून ३,००० रुपये करण्यात येत आहे असे त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते.


Comments
Add Comment

भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ५ लाखांची भरपाई

गंभीर जखमींना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, सरकारचा मोठा निर्णय कर्नाटक : भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास

'पाकिस्तानचा देशव्यापी घातपाताचा कट उधळला; दिल्ली स्फोटावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला करुन अनेक निरपराध

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक