मोदींच्या वाढदिवशी ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना मिळणार गिफ्ट


दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीतील ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेशी जोडले जाणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता मांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रविवारी (१४ सप्टेंबर) जाहीर झालेल्या ३ कल्याणकारी योजनांविषयी रेखा गुप्ता यांनी माहिती दिली.


योजनेशी जोडले जाण्याकरीता पेन्शनधारकांना ई-जिल्हा पोर्टलद्वारे अर्ज सादर करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. पेन्शन योजनेतील लाभाथ्यांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सर्व पात्र ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभघेण्यासाठी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.


चालू आर्थिकवर्षांमध्ये या योजनेसाठी तब्बल १४९ कोटी रुपयांचे बजेट वाटप करण्यात आले असल्याचे रेखा गुप्ता यांनी सांगितले. नव्या पेन्शन योजनेमुळे ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे जीवन सन्मानाने जगता यावे यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या. भविष्यात लाभाष्यांची संख्या वाढली आणि अतिरिक्त निधीची आवश्यकता भासली, तर सरकार विलंब न करताअतिरिक्त अर्थसंकल्पीय मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिली.


दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पेन्शन योजनेशी संबंधित घोषणा केली होती. ६० ते ६९ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक मदत २००० रुपयांवरून २,५०० रुपये करण्यात येत आहे आणि आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना २,५०० रुपयांवरून ३,००० रुपये करण्यात येत आहे असे त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते.


Comments
Add Comment

Shubman Gill Century : कर्णधार शुभमन गिल नावाचं 'वादळ' थांबायचं नाव घेत नाही! वेस्ट इंडिजला धुवून काढत रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडीत काढला.

यशस्वी जैस्वाल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलचे शानदार कसोटी शतक नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 2nd Test Day 2)

कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय! महिला कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक पाळीची भरपगारी सुट्टी

बेंगळुरू : महिलांच्या आरोग्याचा व कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुसंवादाचा विचार करत कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक

Ai Education : भारत घेणार तंत्रज्ञानाची नवी झेप, तिसऱ्या इयत्तेपासून कॉम्प्युटर नव्हे, आता 'AI' चा धडा! कधीपासून शिकवलं जाणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : भारतातील शिक्षण क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा बदल लवकरच होणार आहे.

जगात २८ कोटी लोक नैराश्यात

 दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी ’जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना मानसिक

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता