मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन !

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. आज दुपारी २ ते ३ या कालावधीत, भातनजवळील एक किलोमीटरच्या परिसरात वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे.


ही वाहतूक बंदी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) मार्फत करण्यात येणाऱ्या २२ केव्ही वीजवाहिन्यांच्या देखभाल आणि फिडर बसवण्याच्या कामासाठी लागू केली आहे.


वाहतूक बंद असलेला भाग:


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कि.मी. ९.६०० ते ९.७०० दरम्यान दोन्ही दिशांनी (मुंबईहून पुण्याकडे व पुण्याहून मुंबईकडे) सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी व अवजड) वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे.


पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे:


मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – कळंबोली सर्कल (पळस्पे) किंवा शेडुंग एक्झिटवरून राष्ट्रीय महामार्ग ४८ (NH-४८) वर वळवले जाईल.


NH-४८ वरून पुढे खालापूर टोल नाका किंवा मॅजिक पॉईंट येथे पुन्हा एक्स्प्रेस वेवर प्रवेश करता येईल.


पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – खोपोली एक्झिट किंवा खालापूर टोल नाक्याजवळून पाली ब्रीज मार्गे NH-४८ वर वळवले जाईल.


पोलीस यंत्रणा सज्ज असून, काम पूर्ण होताच वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


पुण्यातील सहा प्रमुख रस्त्यांवर पे अँड पार्क योजनेची अंमलबजावणी


वरील पर्यायी मार्गांचा वापर करून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरून प्रवास करणारी वाहने खालापूर टोल नाका आणि मॅजिक पॉइंट येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावर प्रवेश करू शकतात. हे काम पूर्ण होईपर्यंत ही वाहतूक अधिसूचना अंमलात राहील. अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक वाहतूक विभाग यांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान दुपारी ३ नंतर काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाईल.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील