Tips: पूजेच्या वेळी या नियमांचे पालन केल्यास नशीब बदलेल आणि मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

मुंबई: हिंदू धर्मात पूजा-पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख-शांती राहते. पण, जर पूजेचे नियम योग्य प्रकारे पाळले नाहीत तर त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही महत्त्वाचे नियम खालीलप्रमाणे आहेत.

1. पूजेची योग्य वेळ:

सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करावी. सूर्योदयापूर्वीची वेळ पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते.

संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा दिवा लावून पूजा करावी.

2. स्वच्छतेचे महत्त्व:

पूजा करण्यापूर्वी जागा आणि पूजेची भांडी स्वच्छ करावीत.

स्वच्छ कपडे घालूनच पूजा करावी. अस्वच्छ कपड्यांमध्ये पूजा करणे अशुभ मानले जाते.

3. मूर्तीची दिशा:

देवाच्या मूर्तींची स्थापना पूजाघरात योग्य दिशेने करावी. मूर्तींचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे.

मूर्ती एकमेकांसमोर नसाव्यात.

4. पूजा करताना:

पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे.

देवी-देवतांना ताजे फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. शिळे फुले किंवा नैवेद्य वापरू नये.

5. दिवा आणि धूप:

तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

पूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावावी, ज्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

6. पूजा संपल्यावर:

पूजा संपल्यानंतर लगेच उठू नये. काही काळ शांत बसून ध्यान करावे.

पूजेनंतर प्रसाद सर्वांमध्ये वाटावा.

या नियमांचे पालन केल्यास पूजा सफल होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि नशीब बदलते.
Comments
Add Comment

हेटवणे प्रकल्प : २९ डिसेंबरला सिडकोचा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू

नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याला चालना मिळणार नवी मुंबई : नवी मुंबईला सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पाणीपुरवठा

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी