मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे प्रवास अधिक स्वस्त आणि सुलभ होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.



इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीचे भाडेदर :


प्रारंभिक १.५ किलोमीटरसाठी ₹१५ , त्यानंतर प्रत्येक किमीला ₹१०.२७ आकारले जाणार आहे . हे दर ई-बाईकसाठीच लागू होतील.


ही सेवा ओला, उबर आणि रॅपिडो या मोठ्या मोबिलिटी कंपन्यांना तात्पुरत्या परवान्यांद्वारे मंजूर करण्यात आली आहे. स्मार्ट-राईड या चौथ्या कंपनीला अटी पूर्ण न केल्यामुळे मंजुरी नाकारण्यात आली आहे.



नियमावली व परवाने


महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५ नुसार कंपन्यांना पुढील महिन्यात कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.


हा निर्णय १८ ऑगस्ट रोजी राज्य परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.


सेवा सुरू ठेवण्यासाठी सर्व नियम आणि अटींचे पालन आवश्यक आहे.


मुंबईत सध्या काळी-पिवळी टॅक्सीची सुरुवातीची भाडेवाढ ₹३१, तर ऑटो रिक्षासाठी ₹२६ आहे. त्यामानाने बाईक टॅक्सीची सेवा कमी दरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे .



कोणत्या शहरांमध्ये मिळणार ई-बाईक टॅक्सी सेवा ?


राज्य सरकारने ठराव जाहीर करून जिथे लोकसंख्या १ लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ही सुविधा फक्त मुंबईपुरती मर्यादित न राहता, इतर मोठ्या शहरांमध्येही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे