कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन


कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये आलेल्या ग्राहकाने तेथील महिला कर्मचारीकडे एका वस्तूसंदर्भात विचारणा केली असता या तरुणीने हिंदी भाषेतून उत्तर दिले. याबाबत ग्राहकाने 'तुम्हाला मराठी बोलता येत नाही का?' असा प्रश्न केला असता सदर तरुणीने 'मराठी बोलता आले नाही तर काय फरक पडतो?' असे उत्तर ग्राहक सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांना दिले. यानंतर घाणेकर यांनी थेट तेथील व्यवस्थापकांकडे सदर तरुणीची तक्रार केल्यानंतर व्यवस्थापकांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. महिनाभरात सदर दुकानातील प्रत्येक कर्मचाचाऱ्यांना मराठी बोलता आले पाहिजे, अन्यथा या दुकानात खरेदी करू नका, असे आवाहन आपण नागरिकांना करणार आहोत, असा इशारा घाणेकर यांनी व्यापारी संकुल दुकान व्यवस्थापनाला दिला आहे.


मार्टमध्ये वस्तू खरेदी करताना घाणेकर यांनी मंचकासमोरील ग्राहक सेवेतील तरुणीला खरेदीच्या वस्तू देण्याची मागणी केली. तरुणीने हिंदीतून बोलण्यास सुरुवात केली. घाणेकर यांनी तुम्हाला मराठी येत नाही का, असा प्रश्न केला. तरुणीला घाणेकर कोण याचा परिचय नसल्याने बोलण्याची सक्ती आहे का. नाही आली तर काय फरक पडतो, अशी उलट उत्तरे दिली. ही उत्तरे तरुणीने रागाच्या भरात हात आदळआपट करत दिली.


घाणेकर यांनी तातडीने पटेल आर मार्ट दुकानाच्या व्यवस्थापनाला ही माहिती दिली. आपण महाराष्ट्रात कधीपासून आहात, असा प्रश्न घाणेकर यांनी विक्रेत्या तरुणीला केला. तिने आपण चार वर्ष महाराष्ट्रात राहत आहोत, असे उत्तर दिले. दुकानाच्या व्यवस्थापक मनीषा धस यांना घाणेकर यांनी घडला प्रकार सांगितला. व्यवस्थापक धस यांनी दुकानातील प्रत्येक कर्मचाऱ्याला मराठी भाषा येईल यादृष्टीने प्रयत्न केले जातील. कामगारांना तशा सूचना केल्या जातील, असे आश्वासन घाणेकर आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. कल्याणमध्ये पुन्हा मराठी आणि परप्रांतीय वाद रंगला आहे.

Comments
Add Comment

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ