कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन


कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये आलेल्या ग्राहकाने तेथील महिला कर्मचारीकडे एका वस्तूसंदर्भात विचारणा केली असता या तरुणीने हिंदी भाषेतून उत्तर दिले. याबाबत ग्राहकाने 'तुम्हाला मराठी बोलता येत नाही का?' असा प्रश्न केला असता सदर तरुणीने 'मराठी बोलता आले नाही तर काय फरक पडतो?' असे उत्तर ग्राहक सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांना दिले. यानंतर घाणेकर यांनी थेट तेथील व्यवस्थापकांकडे सदर तरुणीची तक्रार केल्यानंतर व्यवस्थापकांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. महिनाभरात सदर दुकानातील प्रत्येक कर्मचाचाऱ्यांना मराठी बोलता आले पाहिजे, अन्यथा या दुकानात खरेदी करू नका, असे आवाहन आपण नागरिकांना करणार आहोत, असा इशारा घाणेकर यांनी व्यापारी संकुल दुकान व्यवस्थापनाला दिला आहे.


मार्टमध्ये वस्तू खरेदी करताना घाणेकर यांनी मंचकासमोरील ग्राहक सेवेतील तरुणीला खरेदीच्या वस्तू देण्याची मागणी केली. तरुणीने हिंदीतून बोलण्यास सुरुवात केली. घाणेकर यांनी तुम्हाला मराठी येत नाही का, असा प्रश्न केला. तरुणीला घाणेकर कोण याचा परिचय नसल्याने बोलण्याची सक्ती आहे का. नाही आली तर काय फरक पडतो, अशी उलट उत्तरे दिली. ही उत्तरे तरुणीने रागाच्या भरात हात आदळआपट करत दिली.


घाणेकर यांनी तातडीने पटेल आर मार्ट दुकानाच्या व्यवस्थापनाला ही माहिती दिली. आपण महाराष्ट्रात कधीपासून आहात, असा प्रश्न घाणेकर यांनी विक्रेत्या तरुणीला केला. तिने आपण चार वर्ष महाराष्ट्रात राहत आहोत, असे उत्तर दिले. दुकानाच्या व्यवस्थापक मनीषा धस यांना घाणेकर यांनी घडला प्रकार सांगितला. व्यवस्थापक धस यांनी दुकानातील प्रत्येक कर्मचाऱ्याला मराठी भाषा येईल यादृष्टीने प्रयत्न केले जातील. कामगारांना तशा सूचना केल्या जातील, असे आश्वासन घाणेकर आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. कल्याणमध्ये पुन्हा मराठी आणि परप्रांतीय वाद रंगला आहे.

Comments
Add Comment

लक्ष्य सेनची जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू

नाशिक जिल्हा परिषदेची नूतन इमारत गतिमान कारभारासाठी उपयुक्त ठरेल : मुख्यमंत्री

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

नाशिक : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल

किआ इंडियाने किआ आणि मल्टीब्रँड वाहनांसाठी नवीन वॉरंटी प्लॅनसह व्यवसायात मजबूती नोंदवली

किआ इंडियाने किआ मेक प्री-मालकीच्या कारचे प्रमाणपत्र वय ५ वर्षांवरून ७ वर्षांपर्यंत वाढवले आहे, २४ महिने किंवा