पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने पाकड्यांवर ७ विकेट्सने विजय मिळवला. पहलगाम हल्ल्याची जखम ताजी असताना भारतीय संघाने पाकिस्तानसोबत खेळण्यावर अनेक भारतीयांनी विरोध दर्शवला होता. इतकेच नव्हे तर अनेकांनी या सामन्याचा निषेध देखील केला. मुळात सरकारच्या काही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील धोरणांमुळे बीसीसीआयला भारत आणि पाकिस्तानला एकत्र खेळवावे लागले. असे असले तरी, टीम इंडियाच्या खेळाडूंनी सर्व भारतीयांच्या भावनेचा आदर केला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं देखील टाळलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र यामुळे, आता एक नवीन प्रश्न उपस्थित केला जातो आहे की, हस्तांदोलन न केल्यामुळे टीम इंडियावर आयसीसीकडून दंडात्मक कारवाई करण्यात  येणार की नाही?


दरम्यान, पाकिस्तानच्या टीम मॅनेजरने टीम इंडियाच्या एकाही खेळाडूने हस्तांदोलन न केल्याबद्दल भारताविरुद्ध 'औपचारिक निषेध' नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आयसीसीआय कोणते पाऊल उचलणार? आणि हस्तांदोलन करणे अनिवार्य असतेच का? असे प्रश्न साहजिकच दोन्ही देशांच्या क्रीडा चाहत्यांना पडला आहे.



खेळाचा नियम काय सांगतो?


क्रिकेटच्या नियमांनुसार, जर एखादा संघ सामन्यापूर्वी किंवा नंतर विरोधी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करत नसेल तर तो गुन्हा ठरत नाही. हस्तांदोलन हा खेळ भावनेचा एक भाग मानला जातो. कोणत्याही संघाला किंवा त्यांच्या खेळाडूंना सामन्यादरम्यान त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी हस्तांदोलन करण्यास भाग पाडले जात नाही. दोन्ही संघांचे खेळाडू सामन्यानंतर हस्तांदोलन करतात ही फक्त क्रिकेट संस्कृतीची बाब आहे.  स्पर्धा ही ICC ची असो, ACC ची असो किंवा देशांतर्गत इतर कोणतीही असो, विरोधी संघाशी हस्तांदोलन करणं अनिवार्य नसते.


त्यामुळे पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कोणताही दंड आकारला जाणार नाही, कारण असं करणं क्रिकेटच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन नाही.

Comments
Add Comment

सुनील नरेनचे नवे विक्रम ! आयपीएलच्या इतिहासात असं करणारा तिसरा गोलंदाज....

KKR VS SRH : वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू सुनील नरेनने आता एक नवा विक्रम आपल्या नावी केला आहे. त्याने रविवारी ३ मे रोजी

IPL 2026 च्या प्लेऑफचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, BCCI कडून आली मोठी अपडेट....

मुंबई : आयपीएल २०२६ मधील ४४ साखळी सामने शनिवार २ मे पर्यंत खेळून झाले. यंदाच्या हंगामात ७० साखळी सामने रंगणार आहेत.

मुंबईच्या पराभावनंतर दिग्गज खेळाडू संतापला.. हार्दिकवर जोरदार टिका; वो दिखाऊ कॅप्टेन हे....

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईने नऊ साखळी

प्लेऑफशीची शर्यत रंगली ; अव्वल स्थानासाठी टॉप पाच संघात झुंज.....

IPL 2026 : आयपीएल २०२६ आता रंगतदार होताना दिसत आहे. गुणवतालिकेत अव्वल पाच संघात जोरदार सामने होत आहेत. प्रत्येक संघ

Thomas Cup 2026 : भारताचा उपांत्य फेरीत फ्रान्सकडून पराभव; कांस्य पदकावर समाधान

कोपनहेगन : डेन्मार्कच्या हॉर्सेन्स येथे झालेल्या थॉमस कप २०२६ च्या उपांत्य फेरीत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला

MI IPL 2026 : मुंबई इंडियन्सचे आव्हान जवळपास संपुष्टात

चेन्नई :  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२६ चा हंगाम जवळपास संपला आहे. चेन्नई