दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच महामुंबईतील दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दसऱ्याच्या मुहूर्तावर २ ऑक्टोबरला मेट्रो मार्गिकेचा वरळी ते कफ परेड हा अंतिम टप्पा आणि मंडाळे ते चेंबूर (डायमंड गार्डन) पर्यंतचा मेट्रो २ ब मार्गिकेचा पहिला टप्प्या प्रवाशांसाठी खुला होऊ शकतो.


मेट्रो-३ मार्गिकेचा वरळी ते कफ परेड हा अंतिम टप्पा आणि मेट्रो- २ ब या मार्गिकेचा मंडाळे ते चेंबूर (डायमंड गार्डन) पर्यंतचा पहिला टप्पा हे दोन्ही टप्पे लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. यातील मेट्रो-३ या ३३.५ किमी मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा वर्षभरापूर्वी सुरू झाला आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर यावर्षी मे महिन्यात बीकेसी ते वरळी हा टप्पा सुरू झाला. आता वरळी ते कफ परेड या अंतिम टप्प्याची कामे पूर्ण झाली आहेत व कमिशनर फॉर मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांच्याकडून चाचणी करून घेण्यासाठी एमएमआरसीएलने तयारी सुरू केली आहे.


मेट्रो २ ब ही २३.६४ किमीची मार्गिका आहे. यात २० स्थानके आहेत. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात कुर्ला पूर्व, पूर्व द्रुतगती मार्ग, चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल, मानखुर्द व मंडाळे डेपो ही स्थानके आहेत. या मार्गिकेवर मेट्रोची पहिली चाचणी १५ एप्रिलला करण्यात आली होती. त्यांनी मेट्रोच्या कामासंदर्भात काही सूचना केल्या होत्या. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर आता सीएमआरएसकडून अंतिम चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही मेट्रो मार्गिका दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होऊ शकतात.

Comments
Add Comment

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे