सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते.


डोंबिवली: भारताने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी हा विजय पहलगाम हल्ल्यातील बळींना समर्पित केला असला तरी, या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी टीम इंडियाने हा सामना खेळायलाच नको होता अशी ठाम प्रतिक्रिया दिली आहे.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले डोंबिवलीचे संतोष जगदाळे, यांची पत्नी प्रगती जगदाळे यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये काल खेळल्या गेलेल्या आशिया कप २०२५ सामन्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  त्यांनी म्हंटले, "भारतीय खेळाडूंनी दबावाखाली पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी माझी इच्छा आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नकोच होते."

काय म्हणाल्या प्रगती जगदाळे?


प्रगती जगदाळे पुढे म्हणाल्या की, मी सूर्यकुमार यादवला सांगू इच्छिते की, पहलगाम हल्ल्यातील बळींना हा विजय समर्पित करण्याऐवजी, टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नको होते. जर भारताने हा सामना खेळला नसता तर आम्हाला अधिक अभिमान वाटला असता, परंतु टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला, ज्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.

त्या पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ जणांचा बळी घेतला आहे. याआधी झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे दहशतवादी होते. आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान आपला शत्रू आहे. आपण त्यांच्यासोबत खेळायला नकोच. टीम इंडियाने विजयासह हा सामना पहलगाम हल्ल्यातील बळींना समर्पित केला आहे, परंतु जर ते जिंकले नसते तर आमच्या खेळाडूंना पश्चात्ताप झाला असता. भारतीय खेळाडूंनी दबावाखाली पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी माझी इच्छा आहे"

रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाला भारताने १२७/९ च्या धावसंख्येवर रोखले. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक ४० धावा केल्या, तर शाहीन आफ्रिदीने संघाच्या खात्यात ३३ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल भारताने केवळ १५.५ षटकांत विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत ४७ धावा काढत नाबाद राहिला, तर तिलक वर्माने संघाच्या खात्यात ३१ धावांचे योगदान दिले.  या विजयासह 'सुपर फोर'मध्ये भारताचा प्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे.
Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर