रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे या कार्यालयात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यावर आभाळ कोसळण्याची शक्यता आहे.


मुळात, TCS ने जून २०२५ मध्येच भोपाळ येथील कार्यालय बंद केले होते आणि आता तेथून हळूहळू मालमत्ता स्थलांतरित केली जात आहे. यासंदर्भात जेव्हा TCS च्या  कर्मचाऱ्यांनी मध्य प्रदेशचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली तेव्हा ही बातमी समोर आली.



TCS ची भोपाळ शाखा बंद


TCS ने मध्यप्रदेश येथील भोपाळमध्ये असलेली आपली शाखा अचानक बंद केल्याची बातमी धक्का देणारी आहे. कारण यामुळे शहराच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मुळात, TCS  मध्य प्रदेशातून वार्षिक ५०० कोटी रुपयांची उलाढाल करते, तसेच सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीची अनिश्चितता यामुळे भेडसावू शकते.



भोपाळ शाखा बंद करण्याचे कारण काय?


TCS चे भोपाळ शाखा बंद करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु कर्मचाऱ्यांना हस्तांतरणाची माहिती दिली जात आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जगदीश देवरा यांनी TCS च्या CEO ला पत्र लिहून, भोपाळ येथील TCS चे कार्यालय बंद न करण्याचे निवेदन केले आहे. त्यांनी या पत्रात असे म्हंटले आहे की,  TCS सप्टेंबर २०२५ पर्यंत त्यांची भोपाळ शाखा बंद करण्याची योजना आखत आहे.  मात्र, राज्य सरकारला TCS च्या  अहमदाबाद, पाटणा, लखनौ, भुवनेश्वर आणि कोची प्रमाणेच त्यांची भोपाळ शाखादेखील कायम ठेवायची आहे. त्यांनी नमूद केले की या बंदमुळे राज्याला कोट्यवधी रुपयांचे महसूल नुकसान होऊ शकते आणि हजारो लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.



मध्य प्रदेशचे काय नुकसान होऊ शकते?


TCS कार्यालय बंद झाल्यामुळे केवळ नोकऱ्यांवरच परिणाम होणार नाही तर राज्याला आर्थिक धक्का बसू शकतो. मध्य प्रदेशातील उद्योग आणि वाणिज्यसाठी भोपाळ येथील TCS चे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि TCS च्या ५०० कोटी रुपयांच्या उलाढालीमुळे राज्याला मोठा कर महसूल मिळत आहे. भोपाळ कार्यालयात सुमारे १,००० कर्मचारी काम करत होते आणि आता त्यांना रोजगार अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. जर TCS ने कार्यालय पूर्णपणे बंद केले तर या कर्मचाऱ्यांना नवीन नोकऱ्या शोधाव्या लागतील, ज्यामुळे आर्थिक संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण!  हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल

Railway Security : दगडफेक करणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाची ड्रोनद्वारे करडी नजर

नवी दिल्ली : धावत्या रेल्वेगाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या