रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे या कार्यालयात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यावर आभाळ कोसळण्याची शक्यता आहे.


मुळात, TCS ने जून २०२५ मध्येच भोपाळ येथील कार्यालय बंद केले होते आणि आता तेथून हळूहळू मालमत्ता स्थलांतरित केली जात आहे. यासंदर्भात जेव्हा TCS च्या  कर्मचाऱ्यांनी मध्य प्रदेशचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली तेव्हा ही बातमी समोर आली.



TCS ची भोपाळ शाखा बंद


TCS ने मध्यप्रदेश येथील भोपाळमध्ये असलेली आपली शाखा अचानक बंद केल्याची बातमी धक्का देणारी आहे. कारण यामुळे शहराच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मुळात, TCS  मध्य प्रदेशातून वार्षिक ५०० कोटी रुपयांची उलाढाल करते, तसेच सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीची अनिश्चितता यामुळे भेडसावू शकते.



भोपाळ शाखा बंद करण्याचे कारण काय?


TCS चे भोपाळ शाखा बंद करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु कर्मचाऱ्यांना हस्तांतरणाची माहिती दिली जात आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जगदीश देवरा यांनी TCS च्या CEO ला पत्र लिहून, भोपाळ येथील TCS चे कार्यालय बंद न करण्याचे निवेदन केले आहे. त्यांनी या पत्रात असे म्हंटले आहे की,  TCS सप्टेंबर २०२५ पर्यंत त्यांची भोपाळ शाखा बंद करण्याची योजना आखत आहे.  मात्र, राज्य सरकारला TCS च्या  अहमदाबाद, पाटणा, लखनौ, भुवनेश्वर आणि कोची प्रमाणेच त्यांची भोपाळ शाखादेखील कायम ठेवायची आहे. त्यांनी नमूद केले की या बंदमुळे राज्याला कोट्यवधी रुपयांचे महसूल नुकसान होऊ शकते आणि हजारो लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.



मध्य प्रदेशचे काय नुकसान होऊ शकते?


TCS कार्यालय बंद झाल्यामुळे केवळ नोकऱ्यांवरच परिणाम होणार नाही तर राज्याला आर्थिक धक्का बसू शकतो. मध्य प्रदेशातील उद्योग आणि वाणिज्यसाठी भोपाळ येथील TCS चे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि TCS च्या ५०० कोटी रुपयांच्या उलाढालीमुळे राज्याला मोठा कर महसूल मिळत आहे. भोपाळ कार्यालयात सुमारे १,००० कर्मचारी काम करत होते आणि आता त्यांना रोजगार अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. जर TCS ने कार्यालय पूर्णपणे बंद केले तर या कर्मचाऱ्यांना नवीन नोकऱ्या शोधाव्या लागतील, ज्यामुळे आर्थिक संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा