नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे लागत आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे. त्याचा थेट परिणाम मुंबईसह इतर शहरातील आवकवर झाला आहे. यंदा तब्बल ६० टक्क्यांनी आवक घटल्याने नारळाचे भाव प्रचंड वाढले आहेत. ऐन नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी सणाच्या तोंडावर ३५ ते ४० रुपये किमतीला मिळणारा नारळ तब्बल ६० रुपये किमतीवर पोहोचला आहे, तर याचमुळे सुक्या खोबऱ्याचे भावदेखील किलोमागे ४०० रुपये पार गेले आहेत.


नारळाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने यंदा सण, उत्सव साजरे करताना नागरिकांना नारळाची वाढती महागाई सोसावी लागणार आहे. यावर्षी जून, जुलै महिन्यांत आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यात पावसामुळे नारळाच्या वृक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतकेच नाही तर झाडांवर पांढऱ्या रंगाच्या माशांचा प्रादुर्भाव झाल्याने नारळ मोसमाआधीच गळून पडले. त्यामुळे बहुतांश याच राज्यांतून सुके खोबरे, शहाळे व शेंडीवाल्या नारळाची होणारी आवक घटली आहे. त्यामुळे येत्या नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी सणात नागरिकांना महाग नारळ खरेदी करण्याची वेळ आली आहे. नारळाचीही आकार आणि वजनानुसार वर्गवारी केली जाते. यामध्ये मोठ्या शेंडीवाले फुलनार, कमी शेंडीवाले कंगनार, खोबऱ्याची वडी बनविण्यासाठी वापरले जाणारे बॉम्बे चिल, आंध्र प्रदेशातून येणारे रायपूर चिल व मोठ्या आकाराचा चारपट्टा अशा प्रकारच्या नारळाला विशेष मागणी असताना त्यांचे भाव वाढले आहेत.


शेंडीवाल्या नारळाची आवक ४० टक्के


गणेशोत्सव सुरू झाल्यापासून शेंडीवाल्या नारळाची मागणी वाढली. होलसेल बाजारात ३२ रुपयांना मिळणारे नारळ किरकोळ बाजारात तब्बल ६० रुपयांवर पोहोचले. नारळाची आवक ४० टक्केच होत असल्याने भाव वाढल्याचे व्यावसायिक सांगतात. पावसामुळे खोबऱ्याला बुरशी लागते. पावसामुळे नारळाच्या झाडांचे नुकसान झाले. यामुळे देवाला अर्पण केले जाणारे शेंडीचे नारळ ६० रुपयांपर्यंत, तर सोललेल्या नारळाची किंमत ८० रुपये इतकी झाली. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत नारळाच्या किमतींमध्ये तेजी राहणार आहे.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री