नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे लागत आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे. त्याचा थेट परिणाम मुंबईसह इतर शहरातील आवकवर झाला आहे. यंदा तब्बल ६० टक्क्यांनी आवक घटल्याने नारळाचे भाव प्रचंड वाढले आहेत. ऐन नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी सणाच्या तोंडावर ३५ ते ४० रुपये किमतीला मिळणारा नारळ तब्बल ६० रुपये किमतीवर पोहोचला आहे, तर याचमुळे सुक्या खोबऱ्याचे भावदेखील किलोमागे ४०० रुपये पार गेले आहेत.


नारळाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने यंदा सण, उत्सव साजरे करताना नागरिकांना नारळाची वाढती महागाई सोसावी लागणार आहे. यावर्षी जून, जुलै महिन्यांत आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यात पावसामुळे नारळाच्या वृक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतकेच नाही तर झाडांवर पांढऱ्या रंगाच्या माशांचा प्रादुर्भाव झाल्याने नारळ मोसमाआधीच गळून पडले. त्यामुळे बहुतांश याच राज्यांतून सुके खोबरे, शहाळे व शेंडीवाल्या नारळाची होणारी आवक घटली आहे. त्यामुळे येत्या नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी सणात नागरिकांना महाग नारळ खरेदी करण्याची वेळ आली आहे. नारळाचीही आकार आणि वजनानुसार वर्गवारी केली जाते. यामध्ये मोठ्या शेंडीवाले फुलनार, कमी शेंडीवाले कंगनार, खोबऱ्याची वडी बनविण्यासाठी वापरले जाणारे बॉम्बे चिल, आंध्र प्रदेशातून येणारे रायपूर चिल व मोठ्या आकाराचा चारपट्टा अशा प्रकारच्या नारळाला विशेष मागणी असताना त्यांचे भाव वाढले आहेत.


शेंडीवाल्या नारळाची आवक ४० टक्के


गणेशोत्सव सुरू झाल्यापासून शेंडीवाल्या नारळाची मागणी वाढली. होलसेल बाजारात ३२ रुपयांना मिळणारे नारळ किरकोळ बाजारात तब्बल ६० रुपयांवर पोहोचले. नारळाची आवक ४० टक्केच होत असल्याने भाव वाढल्याचे व्यावसायिक सांगतात. पावसामुळे खोबऱ्याला बुरशी लागते. पावसामुळे नारळाच्या झाडांचे नुकसान झाले. यामुळे देवाला अर्पण केले जाणारे शेंडीचे नारळ ६० रुपयांपर्यंत, तर सोललेल्या नारळाची किंमत ८० रुपये इतकी झाली. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत नारळाच्या किमतींमध्ये तेजी राहणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन

मुंबईतील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा

मुंबई: मुंबईमधील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चे कलम १५४ मध्‍ये सुधारणा

मेट्रो-११ मार्गिकेच्या कामाला वेग, 'जायका'कडून ५ हजार ५०० कोटींचे कर्ज

मुंबई : वडाळ्यातील आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो ११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.

तीन कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी मुंबईचे सह-दुय्यम निबंधक निलंबित

मुंबई : शासनाचे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी

आरेतील बेकायदा बांधकामांवर आता 'सॅटेलाईट' नजर; 'नेत्रम' ॲपद्वारे अतिक्रमणांचा होणार बिमोड

पालकमंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती; दोषी अधिकाऱ्यांवरही उगारणार बडगा मुंबई : आरे दुग्ध