पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. ही तरुणी वाराणसीतील चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गढवाली टोला परिसरात वास्तव्यास होती. ती मूळची रोमानियाची रहिवासी आहे. फिलिप फ्रान्सिका असे तिचे नाव आहे. भारतीय तत्त्वज्ञान या विषयात ती पीएचडी करत होती.


फ्रान्सिका राहात असलेल्या खोलीचा दरवाजा शुक्रवारी रात्री बराच वेळ उघडला नाही. त्यामुळे घर मालकाने स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घर मालकाकडे असलेल्या डुप्लिकेट चावीने दार उघडले. तेव्हा फ्रान्सिकाचा मृतदेह तिच्या बिछान्यात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.


पोलिसांच्या माहितीनुसार, फ्रान्सिकाची मानसिक स्थिती ठीक नव्हती. पण तिच्या आजारासंबंधीची कोणतीही औषधे खोलीत सापडलेली नाहीत. खोलीत कोणत्याही प्रकारची चिठ्ठीदेखील आढळून आलेली नाही. फ्रान्सिकाला लहानपणापासूनच फिट येण्याचा त्रास होता. त्यासाठी ती उपचार घेत होती. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहात आहेत. फ्रान्सिकाकडे २०२७ पर्यंतचा व्हिसा होता. ती बऱ्याच कालावधीपासून वाराणसीमध्ये राहात होती. त्याआधी ती सूरत आणि अमृतसरमध्ये अभ्यासासाठी वास्तव्यास होती. फ्रान्सिका जिथे भाड्याने राहात होती, तिथे अन्य व्यक्तीही भाड्याने राहत आहेत. घटनेची माहिती रोमानियाच्या दूतावासाला देण्यात आली आहे. बनारस हिंदू विद्यापीठातील ज्या विभागात अभ्यास करत होती, त्या विभागाला तिच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या