Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने मुंबईकर मात्र हैराण झालाय. पुढील तीन तास जोरदार वारा तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.


तसेच घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच पडा असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. ठाणे, तसेच नवी मुंबईत पावसाने जोर धरला आहे. येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी ठाण्याच्या कल्याण,डोंबिवलीसह काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला.


मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी भागात रविवारी मुसळधार पावसाचा, तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही दिवस राज्यातील नागरिकांना उन्हाचा ताप आणि उकाडा सहन करावा लागत होता. मुंबईतचही अशीच परिस्थिती होती. दरम्यान, उपनगरांतील दहिसर, बोरिवली, कांदिवली परिसरात शनिवारी सकाळी जोरदार पाऊस पडला.मुंबईतही शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी २९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल

Jay Pawar : जय पवारांची मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राला भेट

मुंबई, महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य

Chief Minister Devendra Fadnavis : महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी व उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई: