Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप


दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१ वाजता गुवाहाटीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केलवर नोंदवली गेली आहे. आसाम व्यतिरिक्त, या भूकंपाचे धक्के भुटान आणि पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांमध्ये देखील जाणवले. भूकंपामुळे लोकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण दिसून आले.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्रस्थान आसाममधीलच उदलगुडी जिल्ह्यात, जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर नोंदवले गेले. ता भूकंपाचे धक्के भुटान आणि बांगलादेशच्या उत्तरेकडील भागांपर्यंत पोहोचले आहेत. सुदैवाने, या भूकंपात कुणीही जखमी झाल्याची किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.


याआधीही, २ सप्टेंबर २०२५ रोजी, म्हणजे सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल होती.


Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर