Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप


दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१ वाजता गुवाहाटीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केलवर नोंदवली गेली आहे. आसाम व्यतिरिक्त, या भूकंपाचे धक्के भुटान आणि पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांमध्ये देखील जाणवले. भूकंपामुळे लोकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण दिसून आले.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्रस्थान आसाममधीलच उदलगुडी जिल्ह्यात, जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर नोंदवले गेले. ता भूकंपाचे धक्के भुटान आणि बांगलादेशच्या उत्तरेकडील भागांपर्यंत पोहोचले आहेत. सुदैवाने, या भूकंपात कुणीही जखमी झाल्याची किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.


याआधीही, २ सप्टेंबर २०२५ रोजी, म्हणजे सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल होती.


Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या