Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप


दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१ वाजता गुवाहाटीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केलवर नोंदवली गेली आहे. आसाम व्यतिरिक्त, या भूकंपाचे धक्के भुटान आणि पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांमध्ये देखील जाणवले. भूकंपामुळे लोकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण दिसून आले.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्रस्थान आसाममधीलच उदलगुडी जिल्ह्यात, जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर नोंदवले गेले. ता भूकंपाचे धक्के भुटान आणि बांगलादेशच्या उत्तरेकडील भागांपर्यंत पोहोचले आहेत. सुदैवाने, या भूकंपात कुणीही जखमी झाल्याची किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.


याआधीही, २ सप्टेंबर २०२५ रोजी, म्हणजे सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल होती.


Comments
Add Comment

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची