Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप


दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१ वाजता गुवाहाटीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केलवर नोंदवली गेली आहे. आसाम व्यतिरिक्त, या भूकंपाचे धक्के भुटान आणि पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांमध्ये देखील जाणवले. भूकंपामुळे लोकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण दिसून आले.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्रस्थान आसाममधीलच उदलगुडी जिल्ह्यात, जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर नोंदवले गेले. ता भूकंपाचे धक्के भुटान आणि बांगलादेशच्या उत्तरेकडील भागांपर्यंत पोहोचले आहेत. सुदैवाने, या भूकंपात कुणीही जखमी झाल्याची किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.


याआधीही, २ सप्टेंबर २०२५ रोजी, म्हणजे सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल होती.


Comments
Add Comment

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते