राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार


मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी जाहीर केले. राज्यात तीन हजारांपेक्षा जास्त बारव आहेत, या बारवांचे आणि विहिरींचे स्थापत्यशास्त्र वाखाणण्याजोगे आहे. त्याकाळी केलेले पाण्याचे नियोजन कौतुकास्पद असे आहे. याच कारणामुळे व्यवस्थित नोंदी करुन पुढील नियोजनासाठी राज्यातील सर्व बारव आणि विहिरी यांचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार असल्याचे मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.


तज्ज्ञांच्या मदतीने राज्यातील बारव आणि विहिरींच्या पाण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिली. या नियोजनामुळे ज्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते त्या काळात पाणी पुरवठा करण्यास स्थानिक पातळीवर मोठी मदत होणार आहे, असे मंत्री ॲड आशिष शेलार म्हणाले. पुढील तीन महिन्यांत महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे प्राथमिक जिल्हानिहाय सर्वेक्षण पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.


Comments
Add Comment

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत

लोकलच्या दारात उभे राहणे म्हणजे निष्काळजीपणा नव्हे; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : स्वप्नांची दुनिया आणि मायानगरी असलेल्या मुंबईत प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करायला येत असतो. आणि बघता

आयआयटी बॉम्बेकडून भारतासाठी ‘स्वदेशी एआय’ची तयारी

भारतीय भाषांसाठी नव्या तंत्रज्ञान युगाची सुरुवात मुंबई : देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल

भोसरी भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे यांना दणका

दोषमुक्तीबाबतचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला मुंबई : एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना आपल्या पदाचा

कस्तुरबा रुग्णालयातील बर्न्स केअर कक्षाची होणार सुधारणा

आयसीयूसह सर्वसाधारण खाटांची जागा सुसज्ज मुंबई : संसर्गजन्य रोगाच्या आजारांसाठी असलेल्या कस्तुरबा

जुनी शालेय इमारत पाडताना पोर्टेबल पर्यायी शाळा आसपासच सुरु करणार

पुनर्विकास करण्यात येणाऱ्या शालेय इमारतींसाठी महापालिकेने उचलले असे पाऊल मुंबई : माहिममधील महापालिका शाळा