राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार


मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी जाहीर केले. राज्यात तीन हजारांपेक्षा जास्त बारव आहेत, या बारवांचे आणि विहिरींचे स्थापत्यशास्त्र वाखाणण्याजोगे आहे. त्याकाळी केलेले पाण्याचे नियोजन कौतुकास्पद असे आहे. याच कारणामुळे व्यवस्थित नोंदी करुन पुढील नियोजनासाठी राज्यातील सर्व बारव आणि विहिरी यांचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार असल्याचे मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.


तज्ज्ञांच्या मदतीने राज्यातील बारव आणि विहिरींच्या पाण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिली. या नियोजनामुळे ज्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते त्या काळात पाणी पुरवठा करण्यास स्थानिक पातळीवर मोठी मदत होणार आहे, असे मंत्री ॲड आशिष शेलार म्हणाले. पुढील तीन महिन्यांत महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे प्राथमिक जिल्हानिहाय सर्वेक्षण पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.


Comments
Add Comment

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी