राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार


मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी जाहीर केले. राज्यात तीन हजारांपेक्षा जास्त बारव आहेत, या बारवांचे आणि विहिरींचे स्थापत्यशास्त्र वाखाणण्याजोगे आहे. त्याकाळी केलेले पाण्याचे नियोजन कौतुकास्पद असे आहे. याच कारणामुळे व्यवस्थित नोंदी करुन पुढील नियोजनासाठी राज्यातील सर्व बारव आणि विहिरी यांचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार असल्याचे मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.


तज्ज्ञांच्या मदतीने राज्यातील बारव आणि विहिरींच्या पाण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिली. या नियोजनामुळे ज्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते त्या काळात पाणी पुरवठा करण्यास स्थानिक पातळीवर मोठी मदत होणार आहे, असे मंत्री ॲड आशिष शेलार म्हणाले. पुढील तीन महिन्यांत महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे प्राथमिक जिल्हानिहाय सर्वेक्षण पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.


Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण