आरबीआयकडून फोन पे ला २१ लाखांचा दंड

प्रतिनिधी:आरबीआयने (Reserve Bank of India) फोन पे या आघाडीच्या फिनटेक कंपनीला २१ लाखांचा दंड ठोठावला आहे. शुक्रवारी याबद्दल माहिती आरबीआयने दिली आहे. प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटस (Prepaid Payments Instruments PPIs) बाबती तले अनुपालन (Regulations) न पाळल्याबाबत कंपनीवर आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे. एका निवेदनात आरबीआयने म्हटले आहे की,'ऑक्टोबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील कंपनीच्या कामकाजाच्या संदर्भात मध्यवर्ती बँकेने कंप नीची वैधानिक तपासणी केली.'आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याच्या पर्यवेक्षी निष्कर्षांवरून आणि या संदर्भात संबंधित पत्राच्या आधारे आरबीआयने फोन पे ला एक नोटीस बजावण्यात आली आहे, ज्यामध्ये निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड का लावू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली होती.मात्र कंपनीने नोटीसला दिलेले उत्तर लक्षात घेता फोन पे च्या युक्तिवादानंतरही वैयक्तिक सुनावणीदरम्यान केलेले तोंडी सादरीकरण विचारात घेतल्यानंतर आरबीआयला असे आढळून आले की कंपनीविरुद्धचा आरोप कायम आहे ज्यामुळे आर्थिक दंड आकारण्याची आवश्यकता फोन पे ला आहे.


कंपनीच्या एस्क्रो (Escrow) खात्यातील दिवसाच्या अखेरीस शिल्लक रक्कम थकबाकी असलेल्या पीपीएल आणि व्यापाऱ्यांना काही दिवसांच्या देय रकमेपेक्षा कमी होती आणि कंपनीने आरबीआयला या एस्क्रो खात्यातील कमतरता तात्काळ कळवली नाही.' अ से त्यात म्हटले आहे.आरबीआयने असेही म्हटले आहे की हा दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे आणि कंपनीने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर (Validation) निर्णय घेण्याचा बँकेचा हेतू नाही.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली